HW News Marathi
मनोरंजन

सिनेतारका मीनाकुमारीही होती तिहेरी तलाकची बळी!

मुंबई : तिहेरी तलाकच्या जुमली रुढीतून मुस्लीम महिलांची काल सर्वोच्च न्यायालयाने सुटका केली. त्यामुळे धडाडीच्या मुस्लीम महिलांनी आनंदोत्सव साजरा केला. मात्र स्वातंत्र्यानंतर तब्बल सत्तर वर्षांनी हा न्याय मिळेपर्यंत अनेक मुस्लीम महिलांचे जीवन या अनिष्ट प्रथेमुळे भरडले गेले. सर्वसामान्य महिला तर त्याच्या बळी ठरल्याच, पण बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री मीनाकुमारी हिचेसुद्धा आयुष्या तिहेरी तलाकने उद्ध्वस्त केले होते.

खूपच कमी काळात मीनाकुमारीला बॉलिवूडमध्ये सुपरस्टारचा दर्जा मिळाला होता. तिचे लग्न दिग्दर्शक कमाल अमरोही यांच्याबरोबर झाले होते. त्याकाळी लोक कमाल अमरोही यांनाही मीनाकुमारीचे पती या नावानेच अधिक ओळखायचे. याचाच परिणाम त्यांच्या वैवाहिक जीवनावरही झाला. मीनाकुमारीच्या यशामुळे कमाल यांनी तिचा छळ मांडला होता.

मीनाकुमारी ज्या चित्रपटांमध्ये काम करण्यास होकार देत होती, त्या चित्रपटाला कमाल विरोध करायचे. त्यामुळे दोघांमध्ये नेहमीच भाडणे, हाणामाऱ्या होत असत. मीनाकुमारीलामारहाण करणे नित्याचेच झाले होते. ती पतीमुळेखूपच त्रस्त झाली होती.

एक दिवस तर कमाल यांनी रागाच्या भरात मीनाकुमारीच्या श्रीमुखात मारताना तिला तीन वेळा ‘तलाक, तलाक, तलाक’ असे म्हटले. मीनाकुमारीसाठी ते अत्यंत अनपेक्षित आणि धक्कादायक होते. ती त्यांचा त्रास सहन करायची,परंतु तलाक घ्यावा, असा तिने कधी विचारहीकेला नव्हता. या तलाकमुळे तिला खूप मानसिक यातना सहन कराव्या लागल्या. पुढे पुढे या‘तलाक’च्या विचाराने ती नशेच्या आहारी गेली आणि त्यातच तिचे आयुष्य उद्ध्वस्त झाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सुपरस्टार राजेश खन्नांची १० सुपरहिट गाणी

News Desk

…हे नवीन गाणे ट्रेंड स्थापित करण्यास सज्ज

News Desk

स्टार प्रवाहवरील ‘राजा शिवछत्रपती’ पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार

swarit