HW News Marathi
मनोरंजन

#MeToo : संस्कारी बाबूजीआलोक नाथचे सिन्टाचे सदस्यत्व रद्द 

मुंबई | बॉलिवूडमध्ये मीटू मोहिमेला सुरुवात झाल्यानंतर अनेक नामवंत कलाकारांवर या मोहिमे अंतर्गत आरोप झाले आहेत. त्यापैंकी बॉलिवूडचे संस्कारी बाबूजी म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते आलोक नाथ यांचे नाव आले आणि सर्वांच्याच भुवाया उंचावाल्या. यानंतर आलोक नाथ यांना अजून एका मोठ्या कारवाईला सामोरे जावे लागले. लैंगिक शोषणाच्या आरोपानंतर आज आलोक नाथ यांना सिने अ‍ॅण्ड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन अर्थात सिन्टाने कठोर कारवाई करत त्यांचे सदस्यत्व रद्द केलेय.

आलोक नाथ यांच्यावर बॉलिवूडमधील अनेक महिलांनी लैंगिक शोषण व गैरवर्तनाचे आरोप केले होते. याआरोपनंतर सिन्टाच्या एक्झिक्युटीव्ह कमेटीने त्यांना असोसिएशनमधून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे, असे सिन्टाने आपल्या ट्वीटर पोस्टमध्ये लिहिले आहे.

काही दिवसांपूर्वी सिन्टाने आलोक नाथ यांना नोटीस बजावली होती. यावर आलोक नाथ यांनी आपल्यावरील सर्व आरोप धुडकावून लावले होते. विनता नंदा यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये आलोक नाथ यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. मद्यात काही तरी मिसळून आलोक नाथ यांनी आपल्यावर बलात्कार केला, असा आरोप त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये केला होता. विनता नंदा यांच्याशिवाय अभिनेत्री संध्या मृदुल हिनेही आलोक नाथवर गैरवर्तनाचा आरोप केला होता. याशिवाय अभिनेत्री रेणुका शहाने हिनेसुध्दा आलोक नाथ यांच्यावरील आरोप खरे असल्याचे सांगितले होते.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

यंदा ‘या’ सोप्या पद्धतीने बनवा तिळाचे लाडू

News Desk

नाताळ आणि शुभेच्छापत्रे…

News Desk

नो पॉलिटिक्स हिअर…जस्ट लाईफ !

News Desk
राजकारण

नेहरूंमुळेच एक चहावाला पंतप्रधान झाला !

News Desk

नवी दिल्ली | देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विषयावर बोलत असताना ते म्हटले की, ‘नेहरूंमुळेच एक चहावाला पंतप्रधान झाला,’ असे वादग्रस्त विधान करून काँग्रेस नेते शशी थरूर यांनी मोदींवर निशाणा साधला. नेहरुंच्या जीवनावरील ‘नेहरु : द इन्व्हेन्शन’ या थरूर यांनी लिहीलेल्या पुस्तकाच्या नव्या आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी वेळी नाव न घेता मोदींवर टीका केली.

आपल्या देशातील एक चहावाल पंतप्रधान म्हणून लाभू शकतो, हे केवळ नेहरूंमुळे शक्य झाले आहे. तसेच भारतातील प्रत्येक नागरिकाला सर्वोच्च पदावर पोहोचण्याची इच्छाशक्ती निर्माण होते असे म्हटले आहे. थरूर म्हणाले आहे. थरूर यांच्या विधानानंतर सर्व स्तरातून टीका होऊ लागली आहे.

थरूर हे नेमीच वादग्रस्त विधानांमुळे चर्चेचा विषय ठरत आहेत. या आधी काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे ‘शिवलिंगावर बसलेला विंचवासारखे आहेत’ या शब्दात शशी थरूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

Related posts

शरद पवार येत्या १७ सप्टेंबरपासून विधानसभेकरिता राज्यव्यापी दौर्‍यावर

News Desk

“सोन्याचा चमचा घेऊन आलेलेच मुख्यमंत्री झाले पाहिजे का?”, मुख्यमंत्र्यांचे टीकास्त्र

Aprna

काँग्रेसचे सर्जिकल स्ट्राइक ना दहशतवादी, ना जवान, ना देशातील जनता कुणाला कळाले नाही!

News Desk