HW News Marathi
मनोरंजन

पहा… ‘मी टू’ मोहिमेबाबत काय म्हणाले अनिल कपूर

मुंबई | सध्या खूप चर्चेत असलेल्या ‘मी टू’च्या मोहिमेनंतर अभिनेता अनिल कपूर यानेही ‘मी टू’ बाबत आपले मत व्यक्त केले आहे. ‘आपल्यावरील अत्याचाराला महिला उघडपणे वाचा फोडत आहेत, ही खूपच चांगली बाब आहे. जगाने या विषयाकडे मोकळेपणाने पहिले पाहिजे आणि स्त्रियांना काय सांगायचे आहे ते ऐकले पाहिजे,’ अशा शब्दांत अनिल कपूर यांनी आपली भूमिका व्यक्त केली आहे. ‘माझ्या घरातही महिला आहेत माझी बायको, माझ्या मुली आणि या तिघीही स्वतंत्र आहेत. मी त्यांचे ऐकतो आणि जगानेही महिलांचे म्हणणे ऐकायला हवे,’ असे अनिल कपूर म्हणाले आहे. ते म्हटले की, ‘माझ्यासाठी महिला समान नाहीत तर प्रत्येक बाबतीत पुरुषापेक्षा सुपिरिअर आहेत. त्यांच्यावरील अन्यायाला वाचा फुटत असेल तर ते चांगलेच आहे.’

मी टू’ या चळवळी अंतर्गत बॉलिवूडमध्ये सध्या खळबळ उडाली आहे. अभिनेत्री तनुश्री दत्ताने ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर आरोप केल्यानंतर अन्य महिलाही पुढे आल्या आहेत. आलोक नाथ, विकास बहल, रजत कपूर, सुभाष घई अशा दिग्गजांची नावे पुढे आली. या संदर्भात एका कार्यक्रमादरम्यान प्रश्न विचारल्यानंतर अनिल कपूरने ही भूमिका व्यक्त केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

FLASHBACK 2018 : आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांचा राजीनामा

News Desk

मुंबईतील ‘या’ चर्चमध्ये पारंपारिक पद्धतीने साजरा करतात नाताळ

News Desk

अबू धाबीत पार पडला दिमाखदार गणेशोत्सव

News Desk
देश / विदेश

पाकिस्तानचे हेलिकॉप्टर भारताच्या हद्दीत

swarit

श्रीनगर | पाकिस्तानचे हेलिकॉप्टर भारताच्या हवाई सीमे घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. जम्मू-काश्मीरमधील पूंछ सेक्टरमध्ये पाकिस्तानच्या हेलिकॉप्टरने घिरट्या घालताना भारतीय लष्कराला दिसले आहे. सफेद रंगाचे हे हेलिकॉप्टर काही वेळ भारतीय सीमा भागात घिरट्या घालत होते.

पूंछ जिल्ह्यात रविवारी (३० सप्टेंबर)ला दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास पाकचे हेलिकॉप्टर भारताच्या गुलपूर सेक्टरमध्ये भारतीय हवाई हद्दीत घुसले होते. भारतीय जवानांच्या लक्षात येताच त्यांनी हेलिकॉप्टरच्या दिशेने गोळीबारी करण्यास सुरुवात केली. लष्कराच्या प्रत्युत्तर दिल्यानंतर हेलिकॉप्टर पाकिस्तानात परतल्याची माहिती मिळाली आहे.

एका बाजुला पाकिस्तान म्हणते की, भारताने तिसऱ्यांदा पाकिस्तानसोतब भेट नकारली आहे. जर भारत-पाक भेट झाली असती तर दोन्ही देशामध्ये गेल्या ७० वर्षांपासून काश्मीरचा मुद्दा प्रलंबित आहे. आणि दहशतवादी यासारख्या मुद्द्यांवर चर्चा करता आली असती, असे शाह महमूद कुरैशी यांनी म्हटले. त्यामुळे भारताला शांततेसाठी बातचीत करण्याऐवजी अंतर्गत राजकारणाला महत्त्व देणे गरजेचे असल्याचे यावरून सिद्ध होत असल्याचे कुरैशी यांनी महासभेत सांगितले.

या महासभेत भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला दहशतवाद्याच्या मुद्यावरून खडेबोल सुनावले होते.‘पाकिस्तान हा असा शेजारी देश आहे, की ज्याने दहशतवाद पसरवण्याबरोबरच ते सत्य कशा प्रकारे नाकारण्याचे चांगले कसब त्यांना अवगत आहे येते.’ तसेच ‘पाकिस्तानमध्ये २६/११च्या हल्ल्याचा मास्टर माईंड उजळ माध्याने फिरत आहे’. अशा शब्दात स्वराज यांनी पाकिस्तानवर निशाणा साधला.

Related posts

पंतप्रधान मोदी आजही उद्धव ठाकरेंसाठी ‘नरेंद्रभाई’, राऊतांचं सूचक विधान

News Desk

भारतात मोमो चॅलेंजचा दुसरा बळी

Gauri Tilekar

‘मनसे’ची मतं आमच्याशी जुळली तर नक्कीच…! फडणवीसांनी दिले नवे संकेत

News Desk