HW News Marathi
मनोरंजन

आता हिंदीतील हसवणूक पुन्हा सुरु

मुंबई | प्रेक्षकांना पोट धरून हसवणाऱ्या कपिल शर्माचा नवीन कोरा ‘द कपिल शर्मा’ शो पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘द कपिल शर्मा’ शोचा पहिला वहिला टिझर प्रदर्शित झालाय. या नव्या टीजरमध्ये अख्ख्या भारताला वेड लावणा-या, काही क्षणांसाठी सगळी दु:ख विसरून खळखळून हसवणारा कपिलचा शो म्हणजे, प्रेक्षकांसाठी पर्वणी हेच दाखवण्यात आले आहे.

गत वर्षभरात कपिलच्या आयुष्यात प्रचंड उलथापालथ झाली. तो अनेक वादांत सापडला. डिप्रेशन, व्यसन आदींमध्ये गुरफटला. पण आता तो या सगळ्यांतून बाहेर पडला असून छोट्या पडद्यावर परतण्यास सज्ज झाला आहे. मात्र कपिलचा शो कधीपासून येणार, याचा खुलासा मात्र टीजरमध्ये करण्यात आलेला नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

महागड्या साडीमुळे गौरी खान चर्चेत

News Desk

सोप्या रांगोळ्या…

swarit

माधुरी दीक्षित बनविणार मराठी चित्रपट

News Desk
राजकारण

रामाचा पुतळा उभारण्यापेक्षा मंदिर बांधण्यावर भर द्या, धर्मगुरुंचा योगींना सल्ला

News Desk

नवी दिल्ली | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याच्या वेळी योगी आदित्यनाथ यांनी श्रीरामाची २२१ फूट उंचीची मूर्ती उभारणार असल्याची घोषणा केली होती. मात्र योगींच्या या मूर्ती उभारण्याच्या संकल्पनेला धर्म संसदेतील साधू-संतांनी विरोध केला आहे. “श्रीरामाचा पुतळा उभारण्यापेक्षा मंदिर बांधण्यावर भर द्या. त्यासाठी प्रयत्न करा आणि हे करत असताना कुठलाही जातीयवाद करु नका”, असा सल्ला योगींना देण्यात आला आहे.

“आधीच देशभरात महापुरुषांचे भरपुर पुतळे आहेत. पुतळे महापुरुषांचे उभारले जातात देवाचे नाही. श्रीराम हे आपले दैवत आहेत. त्यामुळे श्रीरामाचे मंदिर उभारा पुतळा नाही”, असा सल्ला देखील सर्व संतानी योगी आदित्यनाथ यांना दिला आहे. योगी आदित्यनाथ यांनी २२१ फूट उंच श्रीरामांच्या मूर्तीसाठी शरयु नदीच्या किनाऱ्यावरील जागाही निश्चित केली होती. महाराष्ट्रातील मुर्तीकार राम सुतार यांनी बनविलेल्या मुर्तीची प्रतिकृतीची निवड त्यासाठी करण्यात आली आहे.

वाराणसी येथे २५ ते २७ नोव्हेंबर या तीन दिवसांत परम धर्म संसदेचा मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात जवळपास १००८ संत-महंतांनी सहभाग घेतला. सध्याची हिंदू संस्कृती, हिंदू संस्कृतीचा प्रचार व प्रसार याबाबत या संसदेत चर्चा करण्यात आली. सोबतच राम मंदिर, गंगा नदीचे शुद्धीकरण आणि सनातन धर्म यांसारख्या विषयांवरही चर्चा करण्यात आली. याच चर्चेदरम्यान श्रीरामांचा उभारण्यात येणाऱ्या पुतळ्याला संसदेतील संतानी विरोध केला.

Related posts

भाजपच्या खासदारांना व्हीप जारी

News Desk

#LokSabhaElections2019 : राष्ट्रवादी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर

News Desk

…तरचं हार्दिक पटेल पिणार पाणी 

News Desk