HW News Marathi
मनोरंजन

‘तुला पाहते रे’ ला पुण्यातून विरोध

मुंबई | झी मराठीवरील सध्या प्रसिद्धीच्या झोतात असलेली ‘तुला पाहते रे’ ही मालिका बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे. ही मालिका बंद करण्यासाठी पुण्यातून विरोध होताना दिसत आहे. ‘तुला पाहते रे’ या मालिकेतून समाज प्रबोधनाचं कोणतंही कार्य होत नाही आहे. एकतर ही मालिका बंद करावी अथवा त्यात बदल करावेत. अशा आशयाचं निवेदन माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी पुणे जिल्हाधिकारी राम किशोर नवल यांना दिलं आहे. या मालिकेत कॉलेजमध्ये शिकणाऱ्या २० वर्षीय तरुणीचे ४० वर्षीय व्यक्तीसोबत प्रेमसंबंध दाखवले आहेत. हा संदेश जिजाऊंची शिकवण असलेल्या महाराष्ट्राला घातक आहे. तसेच महाराष्ट्राच्या संस्कृतीचं विदारक चित्र या मालिकेतून दाखवण्यात आल्याचा आरोपही प्रदीप नाईक यांनी केला आहे

‘तुला पाहते रे’ या मालिकेत सुबोध भावे आणि गायत्री दातार यांची प्रमुख भूमिका आहे. मालिकेत विक्रांतचा शत्रू जालिंदर आल्याने मालिकेत नवीन ट्विस्ट आला आहे. मालिकेत पुढे काय होणार आहे हे प्रेक्षकांना जाणून घेण्याची फार उत्सुकता लागली आहे. तर दुसरीकडे ही मालिका महाराष्ट्रासाठी घातक असल्यामुळे बंद करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

आगमन बाप्पाचे | पर्यावरण पूरक गणेशोत्सवासाठी शाडू मातीच्या सुबक मुर्ती

Gauri Tilekar

अमिताभ घोष ठरले यंदाच्या ज्ञानपीठ पुरस्काराचे मानकरी

News Desk

Mahatma Gandhi Death Anniversary | महात्मा गांधींच्या मृत्यूनंतर काय म्हणाले पंडित नेहरू ?

News Desk
देश / विदेश

निवडणूक लढविण्यासाठीच्या वयोमर्यादेवर निर्णय घेण्याचा अधिकार संसदेला !

News Desk

नवी दिल्ली। निवडणूक लढविण्यासाठी वयाची मर्यादा १८ वर्षे करण्यात यावी, अशी मागणी प्रवीण कुमार यांनी याचिकेद्वारे केली होती. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी करण्यात आली. संसदेला यावर निर्णय घेण्याचा अधिकार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने आजच्या सुनावणीत म्हटले आहे. निवडणूक आयोगाचे प्रमुख ओ.पी. रावत यांनीही यापूर्वी उमेदवारांचे वय १८ वर्षे करण्याचे विधान केले होते. तसेच जर मतदान करणाऱ्या मतदारांचे वय १८ वर्षे चालते, तर उमेदवारांचे वय १८ वर्षे का चालत नाही, असेही रावत यांनी म्हटले होते.

आमदार किंवा खासदार पदाच्या निवडणुकांसाठी वयाची अट २५ वर्षे ठेवण्यात आली आहे. त्यामुळे ही अट शिथिल करुन १८ वर्षे करावी, अशी मागणी प्रवीण कुमार यांनी याचिकेद्वारे केली होती. दरम्यान, १९७९ मध्ये तत्कालीन काँग्रेस सरकारने मतदारांसाठी वय २१ वरून १८ वर्षे केले होते. आजचा युवक सुजाण असून त्याचा निवडणूक प्रक्रियेत सहभाग गरजेचा आहे, असे मत तेव्हाचे पंतप्रधान राजीव गांधी यांनी व्यक्त केले होते. सध्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांसाठी वयोमर्यादा २१ वर्षे ठेवण्यात आली आहे.

Related posts

जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरच्या मृत्यूची पाकिस्तानी माध्यमांमध्ये चर्चा

News Desk

#Lockdown 2 :  केंद्र सरकारची लॉकडाऊनची मार्गदर्शन नियमावली जारी

News Desk

अखेर फारूख अब्दुल्लांची नजरकैदतून सुटका

swarit