HW News Marathi
मनोरंजन

‘तुला पाहते रे’ ला पुण्यातून विरोध

मुंबई | झी मराठीवरील सध्या प्रसिद्धीच्या झोतात असलेली ‘तुला पाहते रे’ ही मालिका बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे. ही मालिका बंद करण्यासाठी पुण्यातून विरोध होताना दिसत आहे. ‘तुला पाहते रे’ या मालिकेतून समाज प्रबोधनाचं कोणतंही कार्य होत नाही आहे. एकतर ही मालिका बंद करावी अथवा त्यात बदल करावेत. अशा आशयाचं निवेदन माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी पुणे जिल्हाधिकारी राम किशोर नवल यांना दिलं आहे. या मालिकेत कॉलेजमध्ये शिकणाऱ्या २० वर्षीय तरुणीचे ४० वर्षीय व्यक्तीसोबत प्रेमसंबंध दाखवले आहेत. हा संदेश जिजाऊंची शिकवण असलेल्या महाराष्ट्राला घातक आहे. तसेच महाराष्ट्राच्या संस्कृतीचं विदारक चित्र या मालिकेतून दाखवण्यात आल्याचा आरोपही प्रदीप नाईक यांनी केला आहे

‘तुला पाहते रे’ या मालिकेत सुबोध भावे आणि गायत्री दातार यांची प्रमुख भूमिका आहे. मालिकेत विक्रांतचा शत्रू जालिंदर आल्याने मालिकेत नवीन ट्विस्ट आला आहे. मालिकेत पुढे काय होणार आहे हे प्रेक्षकांना जाणून घेण्याची फार उत्सुकता लागली आहे. तर दुसरीकडे ही मालिका महाराष्ट्रासाठी घातक असल्यामुळे बंद करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

व्रत हरतालिकेचे

Gauri Tilekar

अनु मलिक यांचे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण

News Desk

ड्रीम गर्लला वाढदिवसाच्या शुभेच्छा

News Desk
कृषी

आश्चर्य…शेळीने दिला आठ पायाच्या पिलाला जन्म

News Desk

छत्तीसगढ चार किंवा सहा पिल्लांना जन्म दिलेल्या बकऱ्या आपल्याकडे आहेत. परंतु एका शेळीने तब्बल आठ पाय असलेल्या पिल्लाला जन्म दिल्याचा आश्चर्यकारक प्रकार बलरामपूर येथे घडला आहे.

छत्तीसगढमधील बलरामपूरच्या कर्वशिला गावात हा प्रकार घडलेला असून लोकांनी याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे. हे पिल्लु पाहण्यासाठी पाहण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील लोक येथे गर्दी करीत आहेत. काही लोक याला निसर्गाचा चमत्कारही मानत आहेत. विशेष म्हणजे या करडाची प्रकृती चांगली आहे. पशुवैद्यकीय डॉक्टरांनी हा कुठलाही चमत्कार नसून प्राण्याची वाढ होत असताना दोष निर्माण झाल्याने हा प्रकार घडल्याचे सांगितले आहे

Related posts

माझं मत- तुमच्या शहरातील एटीएमध्ये पैसे आहेत का ?

News Desk

बोंड अळी प्रादुर्भावामुळे तीन कंपन्यांवर गुन्हा दाखल

News Desk

योगी म्हणतात ऊसाचे पीक घेऊ नका, डायबेटीस होईल

News Desk