HW News Marathi
मनोरंजन

महिला दिन आणि विचार करायला लावणारे प्रश्न…!

आज 8 मार्च हा दिवस ‘जागतिक महिला दिन’ म्हणून मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. समाजातील असामान्य कर्तुत्ववान स्त्रियांचा यानिमित्ताने सन्मान होत आहे. मात्र महिला दिन साजरा करणे म्हणजे केवळ छान-छान संदेश पाठवणे, विविध कार्यक्रम घेणे म्हणजे झालं असं नाही.

प्रथम आपली हि संकुचित मानसिकता बदलण्याची गरज आहे. आज महिला दिन आहे खरा पण तरीही काही प्रश्न पडतात अन् ते कधी-कधी अनुत्तरीतच राहतात. असेच प्रश्न अगदी साधे, सोपे, रोजच्याच जगण्यातले, पण विचार करायला लावणारे आहेत…

  • ज्यांना खरंच मदतीची किंवा सहानभुतीची गरज आहे अशा महिलांपर्यंत आपण महिलादिनाच्या निमित्ताने तरी पोहोचणार आहोत की नाही?
  • खेडं असो किंवा शहर सासुरवास किंवा सासरी केला जाणारा छळ ही प्रमुख समस्या आजही कायम आहे. त्याच्या अनुषंगाने काय करता येईल? याचा विचार व्हायला हवा.
  • प्रवासात, सामाजिक आयुष्यात अनेक प्रकारचे लैंगिक, मानसिक, शारीरिक अवहेलना आणि शोषण सहन करत आपले आयुष्य जगणाऱ्या महिलांसाठी आपण आता तरी सेफ झोन तयार करणार आहोत की नाही?
  • महिलांवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. मीडियाधून याची चर्चा होत असताना महिलादिनाची उपयुक्तता आणि यशस्विता यावरच प्रश्नचिन्ह उभे राहतात.
  • देशातल्या काही भागात मुलगी जन्माला येताच त्या नको म्हणून तिला मारून टाकण्याची घ्रुणास्पद प्रथा आहे, त्याच्या प्रबोधनासाठी काही संस्था काम करत आहेत. त्यांना विशेष मदत करायला हवी.
  • स्त्रियांना भेडसावणारी आणि बहुसंख्य वेळा दाबून टाकली जाणारी लैंगिक शोषणाची समस्या अजूनही तेवढीच बिकट आहे. याउलट गुन्हेगार मात्र मोकाट फिरत असतात. या विषयाचे गांभीर्य व त्यानिमित्ताने त्यातून स्त्रियांचे आयुष्य सुखकर होण्याकरिता आपण विचार करायला हवा!
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

Ganesh Chaturthi 2018 | ‘खड्डे आणि वाहतूक कोंडीचा’ देखावा साकारत गणेश भक्ताने मांडली व्यथा

News Desk

चार्ली चॅप्लिनचा नेहरूंसोबत घडलेला हा किस्सा तुम्हाला माहीत आहे का ?

News Desk

महाराष्ट्राची महती सांगणारे “माझा महाराष्ट्र” गीत लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

News Desk
महाराष्ट्र

महाराष्ट्रातील दोन महिलांना ‘राष्ट्रीय नारी शक्ती पुरस्कार’ जाहीर

swarit

नवी दिल्ली – यंदा महाराष्ट्रातील दोन महिलांना ‘राष्ट्रीय नारी शक्ती पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्रातून सिंधुताई सपकाळ आणि उर्मिला आपटे या हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या अमुल्य अशी कामगिरी करणाऱ्या महिलांना जागतिक महिला दिनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

अनाथ मुलांची आई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ आणि भारतीय स्त्री शक्ती या स्वयंससेवी संस्थेच्या माध्यमातून महिलांच्या विकासासाठी काम करणाऱ्या आर्थिक, आरोग्य आणि शिक्षण उर्मिला आपटे या दोघींना राष्ट्रीय नारी शक्ती पुरस्कार मिळणार आहे.

 

Related posts

कोणत्याही शासकीय शाळेतील वीजपुरवठा खंडित होणार नाही! – दीपक केसरकर

Aprna

पर्यायी इंधन वाहन ग्रीन मोबिलिटीमध्ये महाराष्ट्र देशात अग्रेसर राहील! – अनिल परब

Aprna

मुंबईकर शिवसेनेला महापालिका निवडणुकीत जागा दाखवून देतील

News Desk