HW News Marathi
मनोरंजन

रणवीर दीपीका करणार ‘या’ दिवशी लग्न!

मुंबई | बॉलीवुड अभिनेता रणवीर सिंह आणि दीपिका पदूकोण यांची प्रेम कहाणी सर्वांनाच माहिती आहे. अनेक दिवस या प्रेम प्रकरणाची चर्चा सर्वत्र सुरु होती अखेर या दोधांच्या लग्नाची तारीख जाहीर झाली आहे. फिल्मफेअर मॅगझिनच्या रिपोर्टसनुसार हे दोघेही येत्या १० नोव्हेंबर २०१८ रोजी लग्न बंधनात अडकणार आहेत.

दिपीकाच्या चाहत्यांना गेल्या अनेक दिवसांपासून या दोघांच्या लग्नाविषयी उत्सुकता होती. त्या उत्सुकतेला अखेर या तारखेमुळे पुर्णविराम मिळालेला आहे. दरम्यान, रणवीर सिंह आणि दीपिका पदूकोणने लग्नासाठी इटलीमधील ‘लोम्बार्डी’ हे ठिकाण विवाहसोहळ्यासाठी निवडल्याचे माहित समोर आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मोदींची नक्कल केल्याने कलावंताची हकालपट्टी

News Desk

काळवीट शिकार प्रकरणात सलमान खानला ५ वर्षाची शिक्षा 

News Desk

येशूंच्या जन्मदिनाचे महत्त्व…

News Desk
महाराष्ट्र

…तर १ ऑगस्टला होणार जेल भरो आंदोलन

News Desk

मुंबई | राज्यात मराठा समाजाकडून गेल्या काही दिवसांपासून आरक्षणासाठी आंदोलन सुरु आहे. आज सकल मराठा समाजाकडून राज्य सरकारला अल्टीमेटम देण्यात आला आहे. येत्या दोन दिवसात मराठा आरक्षणाबाबत सरकाराने ठोस निर्णय न घेतल्यास १ ऑगस्टला जेलभरो आंदोलन करण्यात येईल असा इशार सकल मराठा समाजाकडून सरकारला देण्यात आला आहे. शनिवारी सकल मराठा समाजाची मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत सरकारला अल्टीमेटम देऊन जेल भरो आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. सरकारकडून मराठा आरक्षणाबाबत चालढकल करण्यात येत असल्याने मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते सध्या आक्रमक झाले आहेत.

मुंबई बंदच्या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाजातील कार्यकर्त्यांकडून मुंबईसह ठाणे व इतर ठिकाणी जाळपोळ आणि तोडफोड करण्यात आली. त्यानंतर राज्य सरकारने आंदोलकांवर गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे सकल मराठा महामुंबईकडून सरकारला दोन दिवसांचा अल्टीमेटम देण्यात आला आहे. आंदोलकांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्या, लाठीमार करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करा, अशी मागणी सकल मराठा समाजाने केली आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटल यांनी मराठा समाजाची माफी मागावी, अशीही मागणी या महामुंबईतील बैठकीत करण्यात आली.

 

Related posts

कोल्हापुरातील झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करणार! – सतेज पाटील

Aprna

जिल्हा बँक निवडणुकीत तिसऱ्यांदा पराभव; राजन तेलींचा भाजप जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा

Aprna

मीरा NX हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन थेटर प्रमुख महिला कर्मचारीचा संशयस्पद मृत्यू

News Desk