HW News Marathi
मनोरंजन

संदीप कुलकर्णी आता निर्मात्याच्या भूमिकेत

मुंबई | समर्थ अभिनयानं स्वतःची ओळख निर्माण केलेला अभिनेता संदीप कुलकर्णी आता निर्मात्याच्या भूमिकेत दिसणार आहे. संदीपने स्वतःची करंबोला क्रिएशन्स या निर्मिती संस्थेची स्थापना केली असून, “डोंबिवली रिटर्न” हा या निर्मिती संस्थेचा पहिला चित्रपट आहे.

श्वास, डोंबिवली फास्ट, ट्रॅफिक सिग्नल, अजिंक्य अशा अनेक चित्रपटांमुळे संदीपची अभिनेता म्हणून ओळख निर्माण झाली. मराठीबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीतही संदीपने लक्षणीय काम केलं. मात्र, “डोंबिवली फास्ट” या चित्रपटातील माधव आपटे ही भूमिका विशेष गाजली. सर्वसामान्य माणसाचा असामान्य प्रवास या चित्रपटातून समोर आला. समीक्षकांसह प्रेक्षकांनीही या चित्रपटाला डोक्यावर घेतलं. अभिनेता म्हणून भूमिकेचे कंगोरे उलगडणारा संदीप आता निर्मिती संस्थेच्या माध्यमातून उत्तमोत्तम कलाकृती घडवण्यासाठी सज्ज आहे. आशयसंपन्नेसह प्रेक्षकांना आवडतील असे चित्रपट निर्मिती संस्थेच्या माध्यमातून येत्या काळात निर्माण केले जाणार आहेत.

मी आणि माझे मित्र महेंद्र अटोले आम्ही दोघांनी मिळून “कंरबोला क्रिएशन्स” या निर्मिती संस्थेची स्थापना केली. त्यांना चित्रपटांमध्ये, विशेषतः चांगल्या आशय निर्मितीमध्ये रस आहे. आम्हा दोघांची आवड सारखीच असल्यानं आम्ही दोघं एकत्र येऊन निर्मिती संस्था सुरू केली. आमचा पहिला चित्रपट आहे “डोंबिवली रिटर्न…”.

“डोंबिवली रिटर्न” ही आजच्या काळातली गोष्ट आहे. एका मध्यवर्गीय कुटुंबाची, सर्वसामान्य माणसाची गोष्ट आहे. “डोंबिवली रिटर्न” हा सायकोलॉजिकल थ्रिलर प्रकारातील चित्रपट आहे. त्याचा पट खूपच मोठा आहे, असं संदीपनं सांगितलं असून नवीन वर्षी फेब्रुवारी महिन्यात हा चित्रपट रसिक प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

Kargil Vijay Diwas : सैनिकांचे साहस, शौर्य आणि समर्पणाची आठवण करून देतो !

News Desk

रजनीकांत यांच्या ‘पेटा’ सिनेमाच्या ट्रेलरची जोरदार चर्चा

News Desk

Ganesh Chaturthi 2018 | मुंबईत हिऱ्यामध्ये अवतरले बाप्पा

News Desk
राजकारण

कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करा | आरपीआय

News Desk

ठाणे | रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यावर अंबरनाथ येथे हल्ला करण्याचा निषेधार्ह प्रकार घडला.त्या दौऱ्यात रामदास आठवले यांच्या सुरक्षेत त्रुटी ठेवून कर्तव्यात कसूर करणाऱ्या जबाबदार पोलिस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी तसेच या हल्ल्यामागील सूत्रधार शोधून काढावा या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने येत्या शुक्रवार दिनांक ४ जानेवारी रोजी संपूर्ण ठाणे आणि पालघर जिल्ह्यात तीव्र निदर्शने आंदोलन करण्यात येणार असल्याची अधिकृत घोषणा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सचिव ठाणे प्रदेश रिपाइंचे निरीक्षक सुरेश बारशिंग यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

ठाणे येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेस सुरेश बारशिंग यांच्या समवेत ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष रामभाऊ तायडे उपस्थित होते. केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवले हल्ला प्रकरणी जबाबदार पोलीस अधिकाऱ्यांवरनिलंबनाची कारवाई करावी या मागणीसाठी रिपाइंच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. भेट घेऊन १७ दिवस झाले तरी अद्याप एकाही जबाबदार पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई झालेली नाही. याबाबत रिपब्लिकन पक्षात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

रामदास आठवले यांच्यावर हल्ला घडविण्यामागे कोण सूत्रधार आहे याचा कसून शोध पोलिसांनी घेतला पाहिजे. त्याबाबत अद्याप तपासात कोणतीही प्रगती झालेली दिसत नाही.ना रामदास आठवलेंवर हल्ला घडविण्याचे कारस्थान कुणाचे आहे हे तापसयंत्रणांनी त्वरित शोधले पाहिजे अशी मागणी सुरेश बारशिंग यांनी केली आहे. याबाबत येत्या दिनांक ४ जानेवारी ठाणे प्रदेश आणि पालघर जिल्ह्यात रिपाइं तर्फे आंदोलन छेडण्यात येणार असल्याची घोषणा रिपाइं तर्फे अधिकृतपणे आज रिपाइं चे सचिव सुरेश बारशिंग यांनी केली आहे.

Related posts

अब्दुल सत्तार गद्दार, चंद्रकांत खैरेंची घणाघाती टीका

News Desk

अंधेरी पूर्व पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी! – शरद पवार

Aprna

भाजप विरोधात एकजूट रॅलीत विरोधकांचा हल्लाबोल

News Desk