HW News Marathi
मनोरंजन

Kargil Vijay Diwas : सैनिकांचे साहस, शौर्य आणि समर्पणाची आठवण करून देतो !

नवी दिल्ली | कारगिल विजय दिवसाची आज २० वी वर्षपूर्ती झाली आहे. २६ जुलै १९९९ रोजी पाकिस्तान विरुद्ध झालेल्या युद्धात भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला होता. या दिनानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ट्वीटर हँडलवरून कारगिल भेटीचे फोटो पोस्ट केले आहे. “हा दिवस आम्हाला सैनिकांचे साहस, शौर्य आणि समर्पणाची आठवण करुन देतो.,” मोदींनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

मोदींनी कारगिल युद्धाच्या विजयानंतर जवानांना जावून भेट घेतले आणि जवानांशी संवाद साधला होता. मोदींनी ट्वीटरवर फोटो पोस्टकरून कारगिलच्या आठवणींना उजाळा दिला आहे. कारगिल विजय दिनानिमित्ताने श्रीनगरमधील श्रीनगरमधील बादामी बाग छावणीत ‘कारगिल विजय दिवास’ च्या २० वर्षपूर्तीसाठी उपस्थित राहून शहिद जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे.

“हा दिवस आम्हाला सैनिकांचे साहस, शौर्य आणि समर्पणाची आठवण करुन देतो. मातृभूमीच्या रक्षणासाठी आपले सर्वस्व अर्णण करणाऱ्या पराक्रमी योद्ध्यांना विनम्र श्रद्धांजली. जय हिंद.”, असे मोदींनीच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे. तर दिल्लीतील वॉर मेमोरियलवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह शहिदांना श्रद्धांजली वाहतील. कारगिल विजय दिवसाची 20 वी वर्षपूर्ती 25 जुलै ते 27 जुलै अशी तीन साजरी होत आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महागड्या साडीमुळे गौरी खान चर्चेत

News Desk

हलव्याच्या दागिन्यांनी सजल्या बाजारपेठा

News Desk

एस. के. राय कनिष्ठ महाविद्यालयाने राबवली स्वच्छता मोहीम

Gauri Tilekar