HW News Marathi
मनोरंजन

स्मिता पाटील बातमीदार ते संवेदनशील अभिनेत्री एक प्रवास

मी रात टाकली, मी कात टाकली

मी मुडक्या संसाराची बाई लाज टाकली..

जेव्हा जेव्हा चित्रपट क्षेत्रातील संवेदनशील अभिनेत्रीचं नाव येते. त्यावेळी स्मिता पाटील यांचं नाव आवर्जून घेतलं जाते.

स्मिता पाटील यांचा जन्म १७ ऑक्टोबर १९५५ साली पुण्यामध्ये झाला. त्यांचे वडील शिवाजीराव गिरधर पाटील राजकीय क्षेत्रात होते. तर आई विद्याताई पाटील समाजसेविका होत्या.स्मिता पाटील यांचे शिक्षण रेणुका स्वरूप मेमोरियल विद्यालय पुणे या शाळेमध्ये पूर्ण केले. स्मिता यांनी अभिनयाचे शिक्षण पुण्यातील फिल्म अ‍ॅन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियात झाले होते. स्मिता यांनी दृकश्राव्य माध्यमाची सुरुवात दूरदर्शनवरील ‘बातमीदार’ या नात्याने केली. त्यानंतर श्याम बेनेगल यांच्या ‘चरणदास चोर’ या चित्रपटातून त्यांनी हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले.त्यांचे अनेक मराठी चित्रपट हि गाजले आहेत. स्मिता यांनी या चित्रपट,दूरचित्रवाणी आणि नाटकांतून कामे करणार्‍या मराठी अभिनेत्री होत्या.

अल्पायुषी ठरलेल्या स्मिता पाटील यांनी विविध व्यक्तिरेखांच्या संवेदना व त्यांचं व्यक्तिमत्व इतक्या प्रभावीपणे आणि सूक्ष्म बारकाव्यांसह अभिव्यक्त केले की त्यामुळे पडद्यावरील सौंदर्याच्या रुढ संकल्पना दुय्यम ठरल्या. मंथन या सिनेमातून त्यांनी सहकारी चळवळीत सक्रिय झालेल्या हरिजन स्त्रियांची व्यक्तिरेखा साकारली. तसेच भूमिका या सिनेमामधून पुरुषप्रधान संस्कृतीत शोषित ठरणार्यार स्त्रीच्या संवेदना प्रभावीपणे अभिव्यक्त केल्या. दलित, शोषित स्त्रियांच्या , बंडखोर स्त्रियांच्या , आंतरिक बळ असलेल्या स्त्रियांच्या प्रतिमा परिणामकारकतेने साकार केल्या. स्मिता यांना दोन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि फिल्म फेअर अवॉर्डने गौरविण्यात आले. तसेच त्यांना पदमश्री या पुरस्काराने गौरविण्यात आले. स्मिता पाटील यांचे लग्न अभिनेते राज बब्बर यांच्यासोबत झाले.स्मिता व राज यांना एक मुलगा आहे प्रतीक बब्बर. गलियों के बादशहा हा त्यांचा अखेरचा चित्रपट ठरला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

सुपरस्टार राजेश खन्ना यांचा आज जन्म दिवस 

News Desk

इतिहास महाराष्ट्र दिनाचा

swarit

सोप्या रांगोळ्या…

swarit
नवरात्रोत्सव २०१८

बहिणाबाईंचे अनमोल काव्य

News Desk

धरित्रीच्या कुशीमध्ये बियबियाणं निजली,

वर पसरली माती जशी शाल पांघरली

बीय डरारे भूमीत सर्व कोंब आले वर,

गहिवरल शेत जस अंगावरती शहार

बहिणाबाईं यांचा जन्म ११ ऑगस्ट १८८० नागपंचमीच्या दिवशी जळगाव जिल्हातील असोदे या गावी झाला. बहिणाबाईं यांचा वडिलांचे नाव उखाजी आईचे नाव भिमाई महाजन होते. बहिणाबाई यांना तीन भाऊ व तीन बहिणी होते.वयाच्या तेराव्या वर्षी नथुजी खंडेराव चौधरी यांच्यासोबत बहिणाबाईंचा विवाह झाला.नथुजी आणि बहिणाबाईंना तीन अपत्ये होती. ओंकार, सोपान आणि काशी.वयाच्या तिसाव्या वर्षी त्यांना वैधव्य आले. बहिणाबाई या निरक्षर होत्या, त्यामुळे त्यांची बहुतांश काव्य लिखित स्वरूपात नाही. बहिणाबाई यांच्या काही काव्ये त्यांचे पुत्र सोपानदेव चौधरी यांनी लिहल्या आहेत,तर काही मावस भावाने लिहिल्या आहेत.

बहिणाबाई यांच्या कविता अहिराणी भाषेमध्ये आहेत.म्हणजेच खानदेशातील त्यांच्या मातृबोलीत, रचिलेल्या आहेत. बहिणाबाई यांच्या कविता या जमीन, शेत,फुले, शेतकऱ्यांचं दुःख,प्राणी,पक्षी आणि निसर्गावर आधारित आहेत.तसेच माहेर, संसार, शेतीची साधने, कापणी, मळणी इ. कृषिजीवनातील विविध प्रसंग बहिणाबाई यांच्या कवितांतून दिसून येतात.काव्यसंग्रहात बहिणाबाईंच्या फक्त ३५ कविता आहेत. बहिणाबाई यांच्या कविता मराठी साहित्यांचा अमूल्य खजिना आहे.या कविता वास्तविक जीवन प्रतिबिंबित करतात.बहिणाबाई चौधरी यांचे ३ डिसेंबर १९५१ रोजी निधन झाले. अत्र्यांनी बहिणाबाईंच्या कविता प्रकाशित करण्यात पुढाकार घेतला.अत्रे ह्यांच्या विस्तृत प्रस्तावनेसह बहिणाबाईंची गाणी १९५२ प्रकाशित झाली. तर दुसरी आवृत्ती १९६९ प्रकाशित झाली.

बहिणाबाईंचे हे अनमोल काव्य जगासमोर आणायला आचार्य अत्रे कारणीभूत ठरले.

अरे खोप्यामधी खोपा

अरे खोप्यामधी खोपा

सुगरणीचा चांगला

देखा पिल्लासाठी तिनं

झोका झाडाले टांगला

पिल्लं निजली खोप्यात

जसा झुलता बंगला

तिचा पिलामधी जीव

जीव झाडाले टांगला

सुगरीण सुगरीण

अशी माझी रे चतुर

तिले जल्माचा सांगती मिये

गण्या गंप्या नर

खोपा इनला इनला

जसा गिलक्याचा कोसा

पाखराची कारागिरी

जरा देख रे माणसा

तिची उलूशीच चोच

तेच दात, तेच ओठ

तुले दिले रे देवानं

दोन हात, दहा बोटं

बहिणाबाई

Related posts

नवरात्रोत्सवाची २९ वर्षांची अखंड परंपरा, चेतनाची माऊली

Gauri Tilekar

आव्हानांचा सामना करत ‘ती’ने केले स्वप्न साकार

News Desk

समाजातील व्यसनाधीनतेच्या विरोधात ‘ती’ खंबीरपणे उभी

News Desk