HW News Marathi
मनोरंजन महाराष्ट्र

विक्रम गोखले काळाच्या पडद्याआड…

मुंबई | ज्येष्ठ कलाकार विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांचं आज (शनिवार, २६ नोव्हेंबर रोजी) वयाच्या 77 व्या वर्षी निधन झालं. पुण्यातील मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारदारम्यान त्यांनी रुग्णालयातच अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली आहे. विक्रम गोखले यांना अभिनयासोबत त्यांना लेखन आणि दिग्दर्शनाची देखील आवड होती.

गेल्या काही दिवसांपासून विक्रम गोखले यांची प्रकृती चिंताजनक होती. विक्रम गोखले हे व्हेंटिलेटरवर असताना काही अफवा सुद्धा पसरल्या गेल्या. विक्रम गोखलेंवर 5 नोव्हेंबरपासून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू होते. यापूर्वीच विक्रम गोखले यांचे निधन झाल्याच्या अफवा पसरल्या होत्या. मात्र, त्या अफवांवर विश्वास ठेवू नका, अशी माहिती विक्रम गोखले यांचे स्नेही राजेश दामले यांनी माध्यमांना दिली होती. याशिवाय गोखले कुटुंबियांनी देखील विक्रम गोखले जिवंत असल्याचे स्पष्ट केले होते. पत्नी वृषाली यांनी सुद्धा त्यांच्या निधनाचे वृत्त फेटाळून लावले होते. यानंतर त्यांची प्रकृती सुधारत असल्याचं सुद्धा समजलं होतं. मात्र, आज अखेर त्यांनी जगाचा निरोप घेतला.

विक्रम गोखले हे मराठी रंगभूमीसह हिंदी चित्रपट आणि टेलिव्हिजनमध्ये सक्रिय होते. ते अभिनेते चंद्रकांत गोखले यांचे पुत्र होते. विक्रम गोखले यांची आजी कमलाबाई गोखले या भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या महिला बालकलाकार होत्या. तर विक्रम गोखले सुद्धा त्यांच्या उत्कृष्ट अभिनयाने ओळखले जायचे. ‘हम दिल दे चुके सनम’, ‘भूल भुलैया’ आणि ‘मिशन मंगल’ यासह अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांमधील कामासाठी ते ओळखले जात होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत असलेले विक्रम गोखले यांचे प्रकृती अस्वास्थ्यामुळे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी वृषाली गोखले व दोन मुली असा परिवार आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

देवेंद्र फडणवीसांना कोरोनाची लागण; ‘काळजी घ्या’ संजय राऊतांचे ट्वीट

Aprna

साहेबांचं नेतृत्व हे लाटातून आलेलं नाही…विरोधकांच्या स्वप्नांवरही पाणी फिरवलं ते पवारांच्या भाषणाने ! रोहित पवारांकडून आठवणींना उजाळा…

News Desk

अखेर मराठवाड्यात दमदार पावसाची हजेरी

News Desk