HW News Marathi
मनोरंजन

श्रींचा बाप्पा यंदा भगव्या महालात

मुंबई | गेली नऊ वर्षे लोअर परळच्या स्वामी समर्थ अध्यात्म परिवाराकडून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा केला जात असून असून यंदा परिवाराने तयार केलेल्या भगव्या महालात बाप्पा विराजमान झाले आहेत. ‘लालबागचा राजा’ची प्रतिकृती असलेल्या त्यांच्या मूर्तीचे वैशिष्टय़े म्हणजे या मूर्तीचे विसर्जन केले जात नाही.

श्री लोकरे यांचे वडील हरिओम विजयानंद स्वामी हे श्री स्वामी समर्थांचे भक्त आहेत. वडिलांच्या प्रेरणेतून आणि श्री स्वामी समर्थ अध्यात्म परिवाराच्या सहकार्याने श्री लोकरे यांच्या लोअर परळच्या त्रिशूळ इमारतीतील घरी 2009 सालापासून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा केला जातो. ‘लालबागचा राजा’वर श्री लोकरे यांची प्रचंड श्रद्धा आहे. म्हणून त्यांनी अभिषेक पूजेसाठी पंचधातूची सुवर्णलेपित श्री गणरायाची मूर्ती असतानादेखील पूजेसाठी फायबरची ‘लालबागचा राजा’सारखी दिसणारी मूर्ती तयार करून घेतली.

गुजरातमधील सुप्रसिद्ध मूर्तिकार अनिकेत मेस्त्री यांनी ती तयार केली आहे. ही मूर्ती वर्षभर काचेमध्ये बंद असते आणि दरवर्षी तिला गणेशोत्सवात दहा दिवसांसाठी बाहेर काढले जाते. यंदा श्रींचा राजा भगव्या महालात विराजमान झाला आहे. या महालाचे रंगकाम श्री लोकरे तसेच मिलिंद पोटफोडे यांनी केले असून श्रींचा राजाची प्रभावळ यंदा लक्ष्मीस्वरूपात आहे.

या गणेशाचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे बाप्पाची आरती. या आरतीसाठी भाविकांची गर्दी होत असते. श्रींचा राजाची महाआरती अगदी पारंपरिक पद्धतीने केली जाते. या आरतीला उपस्थित राहणारी पुरुष मंडळी सोवले नेसूनच आरती करतात. तसेच आरती सुरू होण्यापूर्की 6 शंखांचा नाद , घंटा नाद होतो क नगारा काजकला जातो. त्यामुळे इथले वातावरण अगदी भक्तिमय झालेले पाहायला मिळते. त्यांच्या या आरतीचा मान कलाकार तसेच पोलीस दलास दिला जातो.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

लक्ष्मीकांत-प्रिया यांची हिट केमिस्ट्री

News Desk

Anant Chaturdashi | विसर्जन मिरवणुकीत महापौरांना धक्काबुक्की

swarit

सनी लिओनीचा बायोपिक वादाच्या भौऱ्यात

News Desk
राजकारण

सरसंघचालकांनी वडीलकीच्या नात्याने राज्यकर्त्यांचे कान उपटायला हवेत | ठाकरे

News Desk

सरसंघचालकांची मंदिरप्रश्नी भूमिका सचोटीची आहे, पण राज्यकर्त्यांच्या अंतरंगात त्या सचोटीचा अंश उरला आहे काय? भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे अत्यंत आत्मविश्वासाने सांगतात की, देशात पन्नास वर्षे भाजपचेच राज्य राहील, पण 370 कलम रद्द करू किंवा राम मंदिर नक्की कधी बांधू यावर ते बोलत नाहीत. पेट्रोल, डिझेलची महागाई आणि जवानांचे शिरच्छेद हेच हिंदुस्थानचे भविष्य आहे काय? त्यासाठी पुढची पन्नास वर्षे कुणाला राज्य हवे असेल तर सरसंघचालकांनी वडीलकीच्या नात्याने राज्यकर्त्यांचे कान उपटायला हवेत, पण आज सत्य बोलायला कुणी तयार नाही. असे मत सामनाच्या संपादकीय मधून शिवसेना पक्ष अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.

सामनाचे आजचे संपादकीय

सरसंघचालक मोहन भागवत यांनी नवी दिल्लीत सांगितले की, अयोध्येत लवकरात लवकर राम मंदिर व्हायला हवे. संघातर्फे दिल्लीत तीन दिवसांची एक व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. ही व्याख्यानमाला हिंदुस्थानचे भविष्य वगैरे अशा विषयांवर होती. व्याख्यानमाला संपल्यावर सरसंघचालकांनी लोकांच्या मनातील प्रश्नांना उत्तरे दिली. राम मंदिराचे काय होणार, हा प्रश्न पुन्हा चिघळवला जात आहे. त्यामुळे उत्तरेकडील राज्यात मतांचे धुवीकरण होईल व भाजपच्या जागा वाढतील असे एकंदरीत राजकीय गणित आहे. 370 कलमाबाबत आमची भूमिका स्पष्ट असल्याचे भागवत म्हणतात. 370 कलम हटवल्याशिवाय कश्मीर हा हिंदुस्थानचा भूभाग होणार नाही अशी संघाची भूमिका होती व त्या मतांशी ते कायम असतील तर 370 कलम हटविण्यास विरोध करणार्‍या मेहबुबा मुफ्तीसोबत कश्मिरात भाजपने सरकार स्थापन केले त्याचे काय? 370 कलम हटवले तर दंगे उसळतील असे मेहबुबांचे सांगणे होते. तरीही तिच्याशी सत्तेसाठी निकाह लावणे योग्य होते काय व हा निकाह लावण्यात ‘काझी’ची भूमिका पार पाडणारे राम माधव यांच्यासारखे संघ स्वयंसेवकच होते. राम मंदिर व्हायला हवे असे

सरसंघचालक सांगतात

ते दिल्लीतील मोदी सरकारने गांभीर्याने घ्यायला हवे, पण राम मंदिर हा प्रचाराचा आणि निवडणुकीचा मुद्दा बनला आहे आणि त्यामुळे हिंदुत्व चेष्टेचा विषय बनत चालला आहे. उत्तरेतील एका भाजपच्या नेत्याने तर अशी मुक्ताफळे उधळली आहेत की, खुद्द पंतप्रधान मोदीही हादरले असतील. सुप्रीम कोर्टात भाजपचे वजन आहे. त्यामुळे राम मंदिरप्रश्नी आम्ही न्यायालयातून पाहिजे तसा आदेश घेऊन येऊ. राम मंदिराचा प्रश्न हा अशा काही मंडळींनी इतक्या खालच्या थराला नेऊन ठेवला आहे. राम मंदिर हा सेटिंग, मांडवली किंवा व्यापार आहे काय हे आधी स्पष्ट व्हायला हवे. सरसंघचालकांची मंदिरप्रश्नी भूमिका सचोटीची आहे, पण राज्यकर्त्यांच्या अंतरंगात त्या सचोटीचा अंश उरला आहे काय? भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे अत्यंत आत्मविश्वासाने सांगतात की, देशात पन्नास वर्षे भाजपचेच राज्य राहील, पण 370 कलम रद्द करू किंवा राम मंदिर नक्की कधी बांधू यावर ते बोलत नाहीत. पेट्रोल, डिझेल 100 रुपयाला स्पर्श करीत आहे. कश्मीरच्या सीमेवर आमच्या सैनिकांची मुंडकी उडवली जात आहेत. त्यावर कुणी का बोलत नाही? पेट्रोल, डिझेलची

महागाई आणि जवानांचे शिरच्छेद

हेच हिंदुस्थानचे भविष्य आहे काय? त्यासाठी पुढची पन्नास वर्षे कुणाला राज्य हवे असेल तर सरसंघचालकांनी वडीलकीच्या नात्याने राज्यकर्त्यांचे कान उपटायला हवेत, पण आज सत्य बोलायला कुणी तयार नाही. गोरक्षणाच्या नावावर जो उन्माद झाला, माणसे मारली गेली. त्याच्याशी संघाचा संबंध नाही असे श्री. भागवत यांनी सांगितले, पण गोरक्षकांच्या झुंडीच्या झुंडी हिंसा करायला रस्त्यावर उतरल्या तेव्हा हिंदू मतांच्या धुवीकरणाची नवी पहाट उगवल्याच्या आनंदात सगळे बेहोश झाले. गाय, गोवंश वगैरेंचा संबंध हिंदुत्वापेक्षा शेतकर्‍यांच्या अर्थकारणाशी आहे हे त्यावेळी एखाद्या ज्येष्ठाने समजावून सांगितले असते तर शेतकर्‍यांचे भले झाले असते. गोरक्षकाच्या झुंडशाहीमुळे गोवंशाचा बाजार, व्यापार थंडावला. गोवंशांची वाहतूक कोणी करत नाही. त्याचा परिणाम दुधाच्या किरकोळ व्यापार्‍यांवर झाला. या स्थितीत सामान्य माणसांचेच खायचे वांदे झाले तेथे भाकड गाई-बैलांची काय कथा? उलट त्यांच्यासाठी आता शेतकर्‍यांना तजवीज करावी लागत आहे. हे चित्र हिंदूंच्या भविष्यासाठी बरे नाही. देशाच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न हे राम मंदिराच्या स्वप्नासारखे अधांतरी लटकू नये.

Related posts

आता जनता जो निर्णय देईल, तो आम्हाला मान्य असेल !

News Desk

“…जे राजकारण झाले, ते मला व्यथित करणारे”, बाळासाहेब थोरातांची पहिली प्रतिक्रिया

Aprna

HW Exclusive : अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीदरम्यान भाजपकडून पैशाचे वाटप?, ठाकरे गटाचा गंभीर आरोप

Chetan Kirdat