HW News Marathi
मनोरंजन

लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी जाणार असाल तर सावधान !

मुंबई । महाराष्ट्रात गणेशोत्सव जल्लोषात साजरा होत आहे. गणेश भक्त लालबागच्य२ राजाच्या दर्शन घेण्यासाठी भाविक गर्दी करत आहेत. या गर्दीचा फायदा घेऊन पाकीट मारणची चांगलीच चंगळ झाली आहे. लालबाग परिसरात अन्य ठिकठिकाणी गणपती बाप्पा मंडळात विराजमान होऊन चार दिवस उलटले आहे. परंतु याच गर्दीचा फायदा घेऊन चोरटे गणेश भक्तांच्या पाकीटावर हात सफाई करत होते.

तसेच लालबाग परिसरातील काळाचौकी पोलीस ठाण्यात गेल्या चार दिवसांपासून जवळपास १३५ मोबाईल चोरीच्या तक्रारीची नोंद करण्यात आली. मोबाईलच्या तक्रारी नोंदवताना पोलिसांची चांगलीच दमछाक होताना दिसत आहे. मोबाईल चोरीच्या सर्वात जास्त तक्रारी या लालबागचा राजा परिसरात घडत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मुंबईतील गणेशोत्सवात लालबाग आणि परळ भागातून गणपती पाहण्यासाठी लाखोंच्या संख्येने भाविक गर्दी करतात. या गणेश भक्तांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त आणि सीसीटीव्ही कॅमे-यांची सोय केली असून यांच्या आधारे या पाकीट मारांचा पोलीस शोध घेत आहेत. गतवर्षी देखील गणेशोत्सवाच्या काळात पाकीट मार भुरट्या चोरींचा सुळसुळाट होता. तेव्हा पोलिसांनी दोन चो-यांच्या टोळ्या सुरत गॅग आणि यूपी गॅग आशी या दोन्ही टोळीची नावे होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

डॉ. मशहुर गुलाटीला स्वाइन फ्लू

News Desk

सुपरस्टार राजेश खन्ना यांचा आज जन्म दिवस 

News Desk

Kargil Vijay Diwas : जाणून घ्या…कारगिल युद्धाचा संपूर्ण घटनाक्रम

News Desk
मनोरंजन

पाच दिवसांच्या गणेश विसर्जनासाठी महानगरपालिकेची जय्यत तयारी

News Desk

गौरी टिळेकर। पाच दिवसांच्या गणपती गौरींचे आज थाटात विसर्जन करण्यात येणार आहे. कोणतेही सण साजरे करताना पर्यावरणाची हानी होणार नाही याची काळजी घेणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असते. दरवर्षी बाप्पाच्या विसर्जनाच्या निमित्ताने मुंबई महानगरपालिकेकडून कृत्रिम तलावांची सोय करण्यात येते. यावर्षी देखील महापौर निवासाच्या शेजारीच पर्यावरणपूरक कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली आहे.

अशी आहे सोय…

येथे लहान आकाराच्या बाप्पाच्या मूर्तींसाठी 3 ते 4 फुट खोल तलाव तर थोड्या मोठ्या आकाराच्या मूर्तींसाठी 7 ते 8 फुट खोल कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहेत. रंगीबेरंगी फुलांची सजावट करून या कृत्रिम तलावांना एक आकर्षक असे रूप देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे बाप्पाला निरोप देताना करण्यात येणाऱ्या आरतीसाठी 20 ते 25 टेबलांची सोय करण्यात आली आहे. तसेच सर्व निर्माल्य एकत्रित करण्यासाठी निर्माल्य कलशाची देखील सोय येथे करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सुरक्षेच्या दृष्टीने महानगरपालिके कडून त्या पूर्ण भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

बाप्पाचे विसर्जन करण्यासाठी येथे लाईफ गार्डस असतील. तसेच अनुचित प्रकार टाळण्यासाठी मुंबई पोलिसांचे पथक सज्ज आहे. परिसरात स्वच्छता राखण्यासाठी स्वछतादूतांची एक तुकडी देखील येथे नेमण्यात आली आहे.

Related posts

तनुश्री दत्ताने राखी सावंतवर ठोकला मानहानीचा दावा

Gauri Tilekar

मी कुणाचीही माफी मागणार नाही !

News Desk

येशूंच्या जन्मदिनाचे महत्त्व…

News Desk