HW News Marathi
मनोरंजन

लालबागचा राजा मंडळात झालेल्या धक्काबुकी प्रकरणी धर्मादाय आयुक्त डिगेंची चौकशी

मुंबई । लालबागचा राजा मंडळात काल (मंगळवार १८) घडलेल्या संतापजनक प्रकाराबाबत सर्व स्तरातून टीका झाल्या. त्यानंतर घडलेल्या प्रकारची दखल घेत त्याची चौकशी करण्यासाठी धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे नुकतेच लालबागचा राजा मंडळाच्या मंडपात दाखल झाले. डिगे काल आयपीएस अधिकाऱ्यासोबत केलेल्या धक्काबुक्की आणि मुजोरी केल्याप्रकरणी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडे चौकशी केली.

आयुक्तांनी घेतलेल्या या दखलीमुळे लालबागचा राजा मंडळावर सरकारचे नियंत्रण तर येणार नाही ना ? असे प्रश्नचिन्हे निर्माण झाली आहेत. डिगे यांना सचिव साळवी यांनी कालचे प्रकरण मिटले असून पुन्हा असा प्रकार घडणार नसल्याची ग्वाही दिली.

गणेशोत्सवादरम्यान या मंडळाच्या सुरक्षेसाठी दरवर्षी राज्य सरकारचे लाखो रुपये खर्च होतात. तसेच या मंडळात कार्यकर्त्यांची वाढलेली मुजोरी पाहता या मंडळावर सरकारचे नियंत्रण असावे अशा चर्चांना गेल्या अनेक वर्षांपासून उधाण आले आहे. मात्र, या मंडळात दरवर्षी होणारी दादागिरीला लगाम लावण्यासाठी राज्य सरकार महत्वाचे पाऊल उचलण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

‘थार’च्या वाळवंटात रंगणार ‘राग’स्थान’ महोत्सव!

swarit

युवांना ‘अग्निपंख’ देणारे डॉ. कलाम

News Desk

डॉन समीर धर्माधिकारी

News Desk
देश / विदेश

हिंदूत्व हाच मोदी सरकारचा खरा अजेंडा

News Desk

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे सहकारी अनावश्यक मुद्यावरून एकसारखीच भाषा बोलत आहेत. त्यांच्याकडे हिंदुत्त्वाशिवाय बोलायला कोणताच ठोस मुद्दा उरला नसल्याने असे होत आहे, अशी टीका कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांनी केली.

सिद्धरमय्या यांनी शनिवारी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष राहुल यांची भेट घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सिद्धरमय्या यांनी मोदी सरकारवर आगपाखड केली. भाजपाकडून सध्या सातत्याने अनावश्यक मुद्दे उकरुन काढले जात आहेत. योगी आदित्यनाथही अशाच मुद्द्यांवर बोलतात आणि अमित शहादेखील त्यांचीच री ओढतात. या नेत्यांकडे मांडण्यासाठी ठोस मुद्देच उरलेले दिसत नाहीत. पंतप्रधान मोदीनींही कदाचित तेच पालूपद लावले तर आश्चर्य वाटायला नको, असे सिद्धरमय्या यांनी म्हटले.

Related posts

भाजपकडून सरकारी यंत्रणेचा गैरवापर

News Desk

दहशतवादाच्या मुद्यावर आता शांत बसणार नाही | पंतप्रधान मोदी

News Desk

भारत-चीन संघर्षात शहीद झालेल्या ‘त्या’ २० जवानांची नावे जाहीर

News Desk