HW News Marathi
मनोरंजन

लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान मोठा अनर्थ टळला

मुंबई | गिरगाव चौपाटीवर लालबागच्या राजाचे विसर्जन करण्यात आले या विसर्जनादरम्यान एक बोट बुडाल्याची घटना घडली आहे. दरम्यान या अपघातात कोणतीही जिवीत हाणी झालेली नाही. लालबागच्या राजाचे विसर्जन सोमवारी सकाळी करण्यात आले. रविवारी सकाळी निघालेली ही विसर्जन मिरवणुक तब्बल २२ तासांनी लालबाग वरुन गिरगावच्या समुद्र किनारी पोहचली. विसर्जना दरम्यान बुडलेल्या बोटीतील सर्वांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहे. यावेळी बुडलेल्या महिलेसह एका मुलाला उपचारासाठी नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

गतवर्षी प्रमाणे यंदाही बाप्पाला पुढच्या वर्षी लवकर या असे आवाहन करण्यासाठी लाखोंच्या संख्येने मुंबईकरांनी समुद्र किनारी गर्दी केल्याचे पहायला मिळाले. यावेळी आपल्या लाडक्या बाप्पाला लाखो भक्तांनी गिरगावच्या चौपाटीतवर भक्तिमय वातावरणात निरोप दिला. तब्बल २२ तासांच्या मिरवणुकीनंतर लालबागच्या राजाचे विसर्जन करण्यात आले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

स्मिता पाटील बातमीदार ते संवेदनशील अभिनेत्री एक प्रवास

News Desk

…हे नवीन गाणे ट्रेंड स्थापित करण्यास सज्ज

News Desk

पहा… ‘मी टू’ मोहिमेबाबत काय म्हणाले अनिल कपूर

Gauri Tilekar
महाराष्ट्र

अठरा शेतक-यांच्या कुटुंबीयांना ३२ लाखांची मदत 

News Desk

मुंबई:-कापूस आणि सोयाबीन पिकांवर झालेल्या रोग, अळी आणि किडींच्या आक्रमणाचा सामना करण्यासाठी कीटकनाशकांची फवारणी करताना जीव गमावणा-या यवतमाळमधील १८ शेतक-यांच्या कुटुंबियांना राज्य सरकारने २ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

पिकावरील किडींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी फवारण्यात येणा-या कीटकनाशकाने शेतकरी आणि शेतमजुरांचा जीव घेतला आहे. यवतमाळ जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांत १८ शेतकºयांचा मृत्यू झाला. तर ७५० शेतक-यांवर उपचार सुरु असून २५ शेतक-यांना अंधत्व आले आहे.

यवतमाळमधील घटनेची शेतकरी संघटनांनी दखल घेत राज्य सरकारकडे पीडित शेतक-यांच्या कुटुंबियांना भरपाई देण्याची मागणी केली होती. शेतकºयांच्या मृत्यूला शासनाच्या कृषी आणि आरोग्य विभागाचा नाकर्तेपणा जबाबदार असल्याचा आरोप वसंतराव नाईक स्वावलंबी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केला होता. दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, सरकारी नोकरीमधून अधिकाºयांची हकालपट्टी करण्याची मागणीही त्यांनी केली होती.

Related posts

राज्य सरकारची शेतकरी सन्मान कर्जमाफी योजना फसवी निघाली !

News Desk

आपल्या पाल्याला कोरोना होण्याची भीती असेल तर शाळेत पाठवू नये – अदिती तटकरे

News Desk

भाजपाचे ज्येष्ठ नेते पांडुरंग फुंडकर यांची कारकीर्द

News Desk