HW News Marathi
विधानसभा निवडणूक २०१९

बारामती देशात अव्वल म्हणून ती सर्वांना हवीहवीशी वाटते !

औरंगाबाद | ‘बारामती देशात अव्वल आहे, म्हणून ती सर्वांना हवीहवीशी वाटते, आणि त्याचा मला अभिमान आहे,’ असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली आहे. २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत बारामतीत भाजपचा उमेदवार निवडून येईल, असे विधान चंद्रकांत पाटील यांनी केले होते. यावर सुप्रिया सुळे यांनी औरंगाबाद येथे पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या की, ‘राष्ट्रवादी विधानसभा निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढणार असून कारण सध्या राज्यात विकास सोडून सर्व सगळे सुरू असल्याचे म्हणत भाजपला टोला लगावला.’ यावेळी राज्यात आणि देशात आर्थिक मंदीचा परिणाम आहेच, ते नाकारून चालणार नाही. त्या म्हणाल्या, उद्योजकांकाडून प्रसिध्द करण्यात येणाऱ्या सीमच्या अहवालात सत्तर वर्षात एवढी मंदी आली नाही असा उल्लेख करण्यात आला आहे. स्टील, सिमेंट, सर्व्हिस इंडस्ट्रीज या सगळ्याच क्षेत्रात सध्या मंदीचे वातावरण आहे.

नोटबंदी, जीएसटीच्या निर्णयाचे परिणाम खऱ्या अर्थाने आता दिसायला लागले आहेत. आर्थिक मंदीमुळे जी काही माहिती समोर येत आहे, त्यातील आकडेवारी ही सरकारी आहेत. भविष्यात बेरोजगारीचा गंभीर विषय आमच्यासाठी आव्हान असेल हे सरकारनेच मान्य केले आहे. सरकारला व्हिजन नसल्याचा हा परिणाम असल्याचे सुळे यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्र्यांच्या ५ वर्षाच्या काळात सर्वात जास्त जातीय तणाव, पोलिसांचा अहवाल

News Desk

 काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

News Desk

राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला आजपासून सुरुवात

News Desk