HW News Marathi
विधानसभा निवडणूक २०१९

आमची युती महाराष्ट्राच्या नेत्यांशी झाली नाही !

नागपूर | लोकसभा निवडणुकीत किंगमेकर ठरलेल्या वंचित बहुजन आघाडीत विधानसभा निवडणुकीपूर्वीच उभी फूट पडली आहे. एमआयएम आणि भारिप बहुजन महासंघ यांची वंचित बहुजन आघाडीत निवडणुकीच्या जागावाटपावरून नारज असून विधानसभा निवडणूक ही स्वबळावर निवडणूक लढविणार असल्याचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी दोन दिवसांपूर्वी त्याबाबत घोषणा केली आहे. यावर पहिल्यांदा भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबडेकर यांनी प्रतिक्रिया दिली.

यात आंबडेकरांनी म्हटले की, “आमची युती महाराष्ट्राच्या नेत्यांशी झाली नाही तर असदुद्दीन एमआयएमचे अध्यक्ष औवेसी यांच्यासोबत झाली आहे. त्यांची माणसे हैद्राबादवरून आमच्याकडे आली आणि ते आता निरोप घेऊन ओवेसींकडे गेली आहेत. याविषयी जो पर्यंत ओवेसी काही स्पष्ट करत नाही तो पर्यंत आमची युती कायम आहे.” विधानसभेसाठी जागावाटपाचा तिढा न सुटल्याने एमआयएमने वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याचं परिपत्रक यापूर्वीच खासदार इम्तियाज जलील यांनी जारी केले आहे.

आंबेडकर यांच्यासोबत गेल्या दोन महिन्यांपासून विधानसभेच्या जागावाटपाबाबत चर्चा सुरु होती. मात्र समाधानकारक जागावाटप होत नसल्याने वेगळे होण्याचा निर्णय घ्यावा लागत आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांपैकी केवळ ८ जागा एमआयएमसाठी सोडण्यास वंचित आघाडीने तयारी दर्शवली होती, ती आम्हाला मान्य नव्हती’, असे इम्तियाज जलील यांनी म्हटले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बाबा नशीब तुम्हाला मुलगा नाही !

News Desk

राष्ट्रवादीचे आमदार अवधूत तटकरे आज शिवसेनेत करणार प्रवेश

News Desk

अखेर राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप सोपल यांच्या हाती शिवबंधन

News Desk