HW News Marathi
विधानसभा निवडणूक २०१९

अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत एमआयएमची वाट बघणार !

मुंबई | एमआयएम आणि भारिप बहुजन महासंघा यांची वंचित बहुजन आघाडीत लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी धूळ चारत मोठी ताकद म्हणून समोर आली. गेल्या काही दिवसांपासून वंचित बहुजन आघाडीत फुट पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. “एमआयएमसोबत आमची युती कायम असून या युतीसाठी अर्ज भरण्याच्या शेवट दिवसापर्यंत वाट बघणार आहोत,” असे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबडेकर यांनी आज (९ सप्टेंबर) मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

प्रकाश आंबेकर यांनी विधानसभा निवडणुकीत एमआयएमला ८ हुन अधिक जागा देण्यास नकार दिल्याने एमआयएमने औरंगबादाचे खासदार इम्तियाज जलील स्वबळाची घोषणा दिली होती. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीकडून नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार एमआयएमसोबतची युती कायम असल्याचे म्हणण्यात आले आहे. जोपर्यंत एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन औवेसी जाहीर करत नाहीत तोपर्यंत आघाडी कायम असल्याचे ‘वंचित’ने आपल्या परिपत्रकात स्पष्ट केले आहे.

यानंतर जलील यांच्या आरोपाला प्रत्युत्तर देत आंबडेकरांनी म्हटले की, “आमची युती महाराष्ट्राच्या नेत्यांशी झाली नाही तर असदुद्दीन एमआयएमचे अध्यक्ष औवेसी यांच्यासोबत झाली आहे. त्यांची माणसे हैद्राबादवरून आमच्याकडे आली आणि ते आता निरोप घेऊन ओवेसींकडे गेली आहेत. याविषयी जो पर्यंत ओवेसी काही स्पष्ट करत नाही तो पर्यंत आमची युती कायम आहे.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हर्षवर्धन पाटील यांच्या भाजप प्रवेशाची वाट गेल्या पाच वर्षापासून पाहत होतो!

News Desk

काॅलर उडवणे भाजपच्या शिस्तीत बसत नाही !

News Desk

आज राष्ट्रवादी-काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

News Desk