HW News Marathi
विधानसभा निवडणूक २०१९

मुख्यमंत्रिपद दिले तरच वंचित आघाडी काँग्रेससोबत !

अकोला । “विधानसभा निवडणुकीत १४४ जागा आणि मुख्यमंत्रिपद दिले तरच वंचित आघाडी काँग्रेससोबत जाईल,” ऑगस्ट अखेरपर्यंत आमचे उमेदवार जाहीर करू, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. आंबेडकर यांनी काल (२८ ऑगस्ट) अकोल्यात पत्रकार परिषदेत त्यांची भूमिका मांडली.

लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेसला ९ ठिकाणी निसटता पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे महाआघाडीत आंबेडकरांनी सहभागी व्हावे, अशी काँग्रेसची अपेक्षा होती. मात्र, राष्ट्रवादीसोबत असेल तर आम्हाला महाआघाडीत सहभागी होणार नसल्याची भूमिका आंबेडकरांनी पत्रकार परिषदेत मांडली.

तसेच ते पुढे बोलताना म्हणाले,वचिंत बहुजन आघाडी आपली भूमिका कॉंग्रेस समोर मांडणार आहे.राष्ट्रवादी कधीही भाजप सबोत जाऊ शकते, अशी टीका आंबेडकर यांनी केली आहे. असेही ते अकोल्यात आयोजित पत्रकार परिषेदेत म्हणाले. तर दुसरीकडे विरोधी पक्ष नसल्यामुळे शेतकऱ्यांचे हाल होणार आहे. त्यामुळे विरोधी पक्षाला जनतेने सत्तेत येऊ दयावे असे यावेळी ते म्हणाले. तर एमआयएमसोबत आमचे मैत्रीचे नाते असून आमची युती होणार असल्याचे आंबेडकरांनी स्पष्ट केले

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधान ‘हाऊडी मोदी’मध्ये भारतीय समुदायाला संबोधित करणार

News Desk

पक्षामध्ये घेण्यापूर्वी आम्ही त्यांना गुजरातच्या निरमा पावडरने धुतो | दानवे

News Desk

काॅलर उडवणे भाजपच्या शिस्तीत बसत नाही !

News Desk