HW News Marathi
महाराष्ट्र

आनंद महिंद्रांनी मागितली कर्मचाऱ्याची माफी

नवी दिल्ली -महिंद्र अॅन्ड महिंद्रा समूहाचे चेअरमन आनंद महिंद्रा आणि टेक महिंद्राचे सीईओ सी. पी. गुरनानी यांची शनिवारी जाहीर माफी मागितली. टेक महिंद्राच्या एचआर आणि एका कर्मचाऱ्याच्या दूरध्वनी संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असून संबंधित कर्मचाऱ्याला कंपनीने काढण्यासाठी वापरलेल्या पद्धतीचा कर्मचाऱ्यानी विरोध दर्शविला आहे.

महिंद्र सोशल मीडियावर म्हणाले, की कर्मचाऱ्यांच्या सन्मानाचे रक्षण करणे हे कंपनीच्या मूलभूत तत्वांपैकी एक आहे. मी वैयक्तिकरित्या या घटनेबद्दल माफी मागतो. प्रत्येकाच्या सन्मानाचे रक्षण करणे हे आमच्या मूलभूत तत्वांपैकी एक आहे. पुढे असा कोणताही प्रकार होणार नाही, याची आम्ही काळजी घेणार आहोत. कंपनीच्या व्हाईस चेअरमनने सुद्धा कर्मचाऱ्याला दिलेला व्यवहार योग्य नव्हता असे मान्य केले आहे. ऑडिओ क्लिपमध्ये एचआर एका कर्मचाऱ्याला म्हणाल्या, कंपनीतून आपल्या पदाचा राजीनामा द्या, अन्यथा कंपनीतून हकलून देण्यात येईल.

हा निर्णय कंपनीने घेतला आहे. नियुक्तीच्या वेळी दिलेल्या पत्रात नमूद केले आहे, की कंपनी कुठल्याही क्षणी कोणत्याही कर्मचाऱ्याला बेसिक पेमेंट देऊन काढू शकते. त्यामुळे, एकदा आपला नियुक्ती पत्र वाचून घ्या. संध्याकाळपर्यंत राजीनामा द्यावाच लागेल, अन्यथा हकलून दिले जाईल, अशी धमकी दिली होती. त्याची क्लिप वायरल झाल्यामुळे महिंद्राच्या मालकालाच माफी मागावी लागली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

पुणे महानगरपालिकेने पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करावे! – चंद्रकांत पाटील

Aprna

२७ जुलैला मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत ‘सामना’तून आता मुख्यमंत्र्यांची मुलाखत होणार प्रदर्शित !

News Desk

“ठाकरे सरकारला तालिबानकडून आदेश येतात का?”, आशिष शेलारांचा सरकारवर हल्ला

News Desk
मुंबई

  विश्वजीत कदम, उद्योजक अविनाथ भोसलेंच्या घरावर आयकर विभागाचा छापा

News Desk

वृत्तसंस्थाः काँग्रेस नेते विश्वजीत कदम आणि उद्योजक अविनाश भोसलेंच्या या दोघांच्याही निवासस्थान आणि कार्यालयावर आयकर विभागाने छापा घातला आहे. माजी वनमंत्री पतंगराव कदम यांचे सुपुत्र असलेले विश्वजीत कदम हे उद्योजक अविनाश भोसले यांचे जावई आहेत. छापेमारी कोणत्या कारणाने झाली आहे, याबाबत अस्पष्टता आहे. अधिकारी सध्या तपासणी करत आहेत. सुरक्षेसाठी स्थानिक पोलिसांचीही मदत घेण्यात आली आहे.

अविनाश भोसले यांच्या कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांचे फोन काढून घेतले आहेत. अशीच तपासणी विश्वजीत कदम यांच्या कार्यालयातही सुरु आहे. अविनाश भोसले आणि विश्वजीत कदम यांच्या कोण-कोणत्या कार्यालयांवर छापेमारी झाली आहे, याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. छापेमारी कोणत्या कारणाने झाली आहे, याबाबतही अस्पष्टता आहे.

Related posts

मुले विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश,

News Desk

भाजपच्या ‘आश्वासनाचा फुगा’ जनताच फोडेल

News Desk

युती तुटल्यास शिवसेनेला ‘दे धक्का’साठी भाजपाची रणनीती

News Desk