HW News Marathi
महाराष्ट्र

आश्रमशाळेतील दोन विद्यार्थिनींना झोपेतच सर्पदंश

इस्लापूर : नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील कुपटी (बुद्रूक) येथील शासकीय आश्रमशाळेतील दोन विद्यार्थिनींना झोपेतच सर्पदंश झाला. शिक्षकांनी या दोघींना तातडीने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केल्याने दोन्ही आदिवासी मुलींचे प्राण वाचले. ही घटना गेल्या गुरुवारी (ता. १३) रात्री एकच्या सुमारास कुपटी येथील शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थिनींच्या वसतिगृहात घडली.

कुपटी (बुद्रूक) येथील शासकीय आश्रमशाळेत पहिली ते दहावीपर्यंत वर्ग असून, या शाळेत १०९ मुले, ११८ मुली असे एकूण २२७ आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेतात. गुरुवारी (ता. १३) सर्व विद्यार्थिनी अभ्यास करून वसतिगृहात झोपल्या होत्या. यातील अंजली विठ्ठल मेढे (सहावी, वय १२), वर्षा सुभाष दांडेगावकर (सातवी, वय १३) यांना सर्पदंश झाला. ही माहिती अधीक्षक टी. बी. राठोड यांना कळताच त्यांनी ए. एस. निवळे व व्ही. डी. सोमुशे या दोन शिक्षकांना आणि सरपंच बापूराव वानोळे यांना तातडीने बोलावून या मुलींना इस्लापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करून नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

पोलीस आयुक्तांची बदली हे आमचं टार्गेट नाहीच !, सरकारच्या निर्णयावर भाजप नेत्यांच्या प्रतिक्रिया

News Desk

पदोन्नतीमधील आरक्षण रद्द ठरवणाऱ्या ठाकरे सरकारच्या जीआरला काँग्रेसकडून विरोध

News Desk

तुमच्या कानाला आणि डोळ्याला त्रास व्हावा म्हणून माझी नियुक्ती, राऊतांचा पाटलांना टोला

News Desk
मुंबई

मुंबईसह परिसरात जोरदार पाऊस

News Desk

मुंबई- मुंबईसह उपनगरात सोमवारी पहाटेपासून जोरदार पाऊस पडत आहे. कुलाबा, नरिमन पॉइंटसह इतर भागात पहाटेपासून जोरदार पाऊस झाल्याने नागरिकांचे हाल झाले. राज्याच्या इतर भागात पावसाने काही प्रमाणात हजेरी लावल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. नाशिक, जळगावसह पश्चिम महाराष्ट्र विदर्भात देखील पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पावसाने सातत्य ठेवल्यास खरिपाच्या पेरण्य हाती लागतील अशी शेतकऱ्यांना आशा आहे. दरम्यान येत्या 24 तासात राज्यात सर्वत्र दमदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

Related posts

ठाण्यातील हिंसाचार प्रकरणी शिवसेना नगरसेविकेच्या पतीसह ३६ जणांना अटक

News Desk

राज्यपाल नियुक्त आमदार नको म्हणून राज्यपालांच्या निर्णयाला फडणवीसांचा पाठिंबा

News Desk

दक्षिण मुंबईतील फोर्ट परिसरात इमारतीला स्लॅब कोसळला, जीवितहानी नाही

News Desk