HW News Marathi
मुंबई

ठाण्यातील हिंसाचार प्रकरणी शिवसेना नगरसेविकेच्या पतीसह ३६ जणांना अटक

ठाणे | बुधवारी मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन आणि बंद स्थगित केल्याची घोषणा समन्वयकांनी केल्यानंतर ही ठाण्यातील नितिन कंपनी येथे रस्ता रोको आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनीही आंदोलन मागे घेण्याचे आवाहन देखील केले होते. ठाण्यातील हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ३६ जणांना अटक केले आहे. यात शिवसेना नगरसेविकेचा पती याचा समावेश आहे. शिवसेनेच्या नगरसेविका निर्मला कापसे यांचे पती शरद कापसे यांनाही अटक करण्यात आले आहे. आणि कापसे यांना पाच दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

मराठा आरक्षण मोर्चा दरम्यान आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. त्याचे व्हिडीओ, सीसीटीव्ही फूटेजच्या सहाय्याने पोलिसांनी या आंदोलन करणाऱ्यांचा शोध घेतला आणि कारवाई केली. हिंसाचार करणाऱ्या अनेक जणांचा मराठा आंदोलनाशी काही संबंध नसल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. नौपाडा पोलिसांनी २३ जणांना आणि वागळे इस्टेट पोलिसांनी १३ अटक करून कारवाई केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गोरेगावमध्ये इमारत कोसळून १ मृत्यू, ८ जण जखमी

News Desk

“कसबा विजयानंतर काँग्रेस राज्य आणि देश जिंकू; परंतु…”, मुख्यमंत्र्यांची सभागृहातून टीका

Aprna

चित्रपटगृह मालक विनामूल्य दाखवणार वृक्षलागवडीचे संदेश

News Desk