HW News Marathi
महाराष्ट्र

उद्धव ठाकरे याचं आव्हान स्विकारायचं सोमय्यापुढे आव्हान

मुंबई मुलुंड डम्पिंग ग्राउंडच्या घोटाळ्यात भाजप खासदार किरीट सोमय्या यांचा हात असल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी केला होता. त्याला प्रतिआव्हान देताना, सोमय्या यांनी शेवाळेंना या घोटाळ्यात माझा किंवा कुटुंबियांचा हात असल्याचे सिद्ध करुन दाखवावे. मी, माझ्या कुटुंबियांची सर्व बॅंक खाती, चेकबुक दाखवायला तयार आहे. नाही तर पारदर्शकतेच्या मोठ्या जाहिराती करणारे उद्धव ठाकरे यांनी आपली संपत्ती ,सर्व खात्यावरील पैसे जाहीर करावी, असे जाहीर आव्हान सोमय्यांनी या निमित्ताने दिले. ठाकरे कुटुंबातील कोणी निवडणुकीला उभे राहत नसल्याने त्यांची संपत्ती अजून जाहीर झालेली नाही. उद्धवजींनी हे संपत्ती जाहीर करण्याचे आव्हान स्वीकारले तर महाराष्ट्रातील जनतेला मोठे गुपित कळाल्याचा आनंद होईल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

भोसरी जमीन प्रकरणी एकनाथ खडसेंना हायकोर्टाकडून दिलासा

News Desk

महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक सक्षमीकरण उपक्रम! – नवाब मलिक

Aprna

‘हिमालयीन गिफ्रॉन’ प्रजातीच्या गिधाडाची अखेर सुटका

Gauri Tilekar
राजकारण

भारिप बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांचा आठवलेंना पाठिंबा

News Desk

मुंबई | भिमाकोरेगाव प्रकरणानंतर प्रकाश आंबेडकर आणि केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले या नेत्यांच्या भूमिकांवरून राज्यभर वादळ उठले होते. मात्र प्रचारकी उडालेला धुरळा निवळल्यानंतर दलित आणि मराठा यांच्यात वाद लावून दरी वाढविण्यापेक्षा वाद मिटवून सामाजिक एकोपा निर्माण करणे हिताचे असल्याचे केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांची समाज जोडणारी भूमिका योग्य असल्याची तरुणांना पटले आहे. त्यातून प्रबोधन झाल्याने मुंबईतील अनुशक्तीनगर येथील भारिप बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाला सोडून केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांचे नेतृत्व स्वीकारले आहे. भारिप बहुजन महासंघ सोडून रिपब्लिकन पक्षात प्रवेश करणा-या कार्यकर्त्यांची मुंबई ठाणे नाशिक आदी जिल्ह्यांतून रामदास आठवलेंच्या संविधान बंगल्यावर रांग वाढू लागली आहे.

भारिप बहुजन महासंघाचे अनुशक्तीनगर तालुका अध्यक्ष गणेश गांगुर्डे यांनी त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला . यावेळी रिपाइं चे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांचे आशीर्वाद घरून गणेश गांगुर्डेनी रिपाइं जाहीर प्रवेश केला. यावेळी रिपाइं चे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अनिलभाई गांगुर्डे, शिलाताई गांगुर्डे, मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे,जिल्हा अध्यक्ष सिद्धार्थ कासारे, रमेश घोक्षे, महावीर सोनवणे,लिंबराज गायकवाड, रमाकांत शिरोळे, दिनेश शिंदे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

आंबेडकरी जनतेच्या हितासाठी रिपब्लिकन ऐक्य होणे गरजेचे आहे. रिपब्लिकन ऐक्यासाठी आपण कोणताही त्याग करण्यास तयार असल्याची केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवलेंची भूमिका योग्य असल्यानेच आपण रिपब्लिकन पक्षात आपल्या कार्यकर्त्यांसह जाहीर प्रवेश केला असल्याचे मनोगत गणेश गांगुर्डे यांनी यावेळी व्यक्त केले.

Related posts

व्हिडिओ पोस्ट केल्यामुळे अडचणीत आल्या किरण खेर आयोगाने पाठविले नोटीस

News Desk

आंध्रप्रदेशमध्ये सीबीआयला बंदी

News Desk

#21daysLockdown | देशातील कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी १५ हजार कोटींची तरतूद

News Desk