HW News Marathi
Covid-19

काटेकोरपणे सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले तर धार्मिक स्थळे सुरु करण्यास कोणी विरोध करणार नाही – राजेश टोपे

मुंबई | राज्यात कोरोनावर प्रादुर्भाव वाढत असल्याकारणाने विनाकारण गर्दी कशी होणार नाही यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. त्यामूळेच राज्यातील सर्व धार्मिक स्थळ बंद ठेवण्यात आली आहेत. मात्र, मंदिरांच्या पुजाऱ्यांकडून तसेच अनेक राजकीय नेत्यांकडून मंदिरे उघडावी अशी मागणी केली जात आहेत. यावर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्वाचे भाष्य केले आहे.

“ धार्मिक स्थळांबाबत लोकल भावनिक असतात. त्यामूळे तिथे सोशल डिस्टन्सचे पालन होणार नाही. जर काटेकोरपणे पालन केले तर धार्मिक स्थळ सुरु करण्यास कोणी विरोध करणार नाही. मात्र, ईश्वर हा सर्वत्र आहे. त्यामूळे थोडी सबुरी बाळगू, वेळ लागला तरी हरकत नाही”, असे राजेश टोपे यांनी मंदिरे पुन्हा सुरु करण्याबाबत मत दिले आहे.

दरम्यान, त्र्यंबकेश्वरच्या पुजाऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने काल (१७ ऑगस्ट) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईतील त्यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी भेट घेतली होती. त्यावेळेस राज ठाकरे यांनी, कशाप्रकारे तुम्ही मंदिरे सुरु करणार, याची नियमावली तयार करा, ही नियमावली राज्य सरकारकडून सुपुर्द करु अशी सूचना यावेळी राज ठाकरे यांनी पुजाऱ्यांना दिली. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक आहे. या बैठकीत हा मुद्दा घेतला जाणार का याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी राज्यातील २७ जिल्ह्यांना प्रत्येकी १० लाख !

News Desk

भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना कोरोनाची लागण

News Desk

म्युकरमायकॅासिस म्हणजे काय ? लक्षण काय आहेत ?उपचार कोणते ?

News Desk