HW News Marathi
महाराष्ट्र

कर्जमाफीसाठी शेतकरी – प्रहार संघटनेची आसुड यात्रा

येत्या 11 एप्रिलपासून सीएम टू पीएम यात्रेला सुरूवात

अभिराज उबाळे

सोलापूर – शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि भविष्यात हमीभाव मिळावा या मागणीसाठी सीम टु पीएम अशी आसुड यात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती, शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी दिली. ११ एप्रिल रोजी महात्मा फुलेंच्या जयंतीदिनी नागपुर मधल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानापासुन या यात्रेला सुरवात होणार आणि वीस जिल्ह्यातुन पंतप्रधान मोदींच्या वडनगर गुजरात येथे यात्रेचा समारोप होणार आहे. आमदार बच्चू कडु यांची प्रहार संघटना आणि शेतकरी संघटना या यात्रेत सामील होणार आहेत. पंढरपूरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते .

तब्बल ३१ वर्षानंतर कॉंग्रेसचे सरकार जावुन भाजप सत्तेवर आले. निवडणूक काळात भाजपने शेतकर्याना उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव देन्याची घोषणा केली होती. सत्तेवर आल्यावर मात्र त्यांनी हे आश्वासन पाळले नसल्याने राज्यात शेतकरी आत्महत्या वाढत असल्याचा आरोप त्यांनी केला. शेतमालावरील निर्यात बंदी कायमची उठवण्याची मागणी त्यांनी केली.

शिर्डीच्या शेतकऱ्यांनी संपावर जाण्याचा घेतलेला निर्णय योग्य असून हा संप राज्यव्यापी व्हावा. शहरात जाणार शेतीमाल दुध बंद करावे असा सल्ला त्यांनी दिलाय. राज्यातील विरोधी पक्ष आणि सेना कर्जमाफी मागत आहे. हे त्यांचे सोंग आहे. सभागृहातल्या एका आमदारने जरी कर्जमाफीचा ठराव मांडावा. त्याला सेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यासह विरोधी पक्षांनी पाठिंबा दिल्यास मुख्यमंत्र्याना कर्ज माफी देण्याशिवाय पर्यायच राहणार नाही, असे त्यांनी सांगितले. गॅसच्या ग्राहकांना सरकार अनुदान देते तसे शेतीमालाच्या ग्राहकांना देखील अनुदान देण्याची नवी मागणी त्यांनी केलीय. देशात नुकत्याच झालेल्या निवडणूकांध्ये आजही जनता कॉंग्रेस विरोधी मतदान करुन आपला राग व्यक्त करत आहे. भाजप सरकारची एफ आर पी पेक्ष जास्त उसदर देन्याची भुमिका असल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी खासदार राजु शेट्टी यांच्यावर सडकुन टिका केलीय.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गहिनीनाथ गडाच्या पंढरपूर वारीचा मार्ग सरकारने मोकळा करावा, पंकजा मुंडेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

News Desk

महाविकासआघाडी सरकारने सत्तेसाठी फक्त मराठा समाजाचा वापर करून घेतला, विनायक मेटेंचा गंभीर आरोप 

News Desk

राज्यात जीवनावश्यक वस्तूसह औषधांची कोणतीही टंचाई नाही, राज्य सरकारचे जनतेला आश्वस्त करणारे पत्रक

News Desk