HW News Marathi
महाराष्ट्र

गॅगस्टार सुरेश पुजारीच्या तीन हस्तकांना अटक

मुंबई खंडणी विरोधी पथकाने गॅगस्टार सुरेश पुजारीच्या तीन हस्तकाना शनिवारी कुर्ला येथुन शस्त्रहस्त्रसहित अटक केली आहे. राज चव्हाण 25, अल्ली अब्बास खान 27 आणि सुधीर 22 असे आरोपीचे नाव आहेत. उल्हासनगर नालासोपारा येथे गोळीबार केल्याची कबुल केले आहे. अशी माहिती खंडणी विरोधी पथकांनी दिली.

गॅगस्टार सुरेश पुजारीचे हस्तक कुर्ला येथे येणार असल्याची माहिती खंडणी विरोधी पथक यांना शनिवारी मिळाली होती. या माहितीवरून खंडणी विरोधी पथक कुर्ला येथे सापळा रचुन तीन जणांना ताब्यात घेऊन झडती घेतली. त्याच्याकडून एके 765 बोहर पिस्तूल ,दोन मॅग्झीन, आठ जिवंत काडतूसे,रोख रक्कम दोन लाख 50 हजार, मोबाईल फोन आणि दोन मोटार साईकल जप्त केले आहे.

याप्रकरणी अधिक तपास केले असता दोन मोटार सायकल चोरी करून त्याचा उल्हासनगर आणि नालासोपारा येथे गोळीबार करण्यासाठी वापर केल्याची कबुल केले आहे. अशी माहिती खंडणी विरोधी पथक अधिका-यांनी दिली आहे अधिक तपास पोलिस करत आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मानधनवाढ होऊनही संप सुरु ठेवणे चुकीचे -मंत्री पंकजा मुंडे

News Desk

उपमुख्यमंत्र्यांची सोशल डिस्टन्स राखत काम करण्याची अनोखी पद्धत !

News Desk

कांदा निर्यातीवरील अनुदानात ५ टक्क्यांनी वाढ, केंद्राचा महत्त्वपूर्ण निर्णय

News Desk
महाराष्ट्र

काँग्रेस उद्यापासून राज्यभर आंदोलन करणार

News Desk

रावसाहेब दानवेंची भाषा‘दानवा’सारखीः खा. अशोक चव्हाण

मुंबई राज्यातीलतूर उत्पादक शेतक-यांना शिवीगाळ करणारे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची भाषा दानवासारखी आहे, अशी खरमरीत टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.

मुंबई येथे पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी दानवे यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांची भाषा दानवासारखीच आहे. भाजप नेत्यांच्या डोक्यात सत्तेची नशा गेल्याने ते बेताल वक्तव्ये करित आहेत. राज्यातला तूर उत्पादक शेतकरी सध्या प्रचंड अडचणीत असून त्या शेतक-यांची सगळी तूर खरेदी करून शेतक-यांना दिलासा देण्याऐवजी शेतक-यांना शिवीगाळ करित आहेत. सत्तेची नशा भाजप नेत्यांच्या डोक्यात गेल्याने ते वारंवार शेतक-यांचा अवमान करत आहेत. आता तर शेतक-यांना शिवीगाळ करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. राज्यातले शेतकरी भाजप नेत्यांची ही नशा उतरवतील असे खा. अशोक चव्हाण म्हणाले.

शेतक-यांना साले म्हणून संबोधणा-या दानवे यांच्याविरोधात काँग्रेस पक्ष राज्यभरात आंदोलन करणार असून दानवे यांना “साला दानवे”अशी पदवी काँग्रेसकडून देण्यात येणार आहे. भाजपला थोडीही लाज असेल तर त्यांनी रावसाहेब दानवेंवर कारवाई करावी आणि राज्यातील शेतक-यांची माफी मागावी असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

Related posts

मुंबई महानगर क्षेत्रातील रस्ते खड्डे, वाहतूक कोंडीमुक्त करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करा! – मुख्यमंत्री

Aprna

राज्य आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर

Adil

स्वप्निल लोणकरच्या कुटुंबीयांच्या 19.96 लाखांच्या थकित कर्जाची परतफेड, फडणवीसांच्या हस्ते धनादेश सुपूर्द 

Ruchita Chowdhary