HW News Marathi
महाराष्ट्र

गटारीपूर्वीच बोकडांवर अत्यंसंस्कार

अहमनगर: गटारी जवळ आल्याने बोकडं फस्त करण्याची खवय्याची चढाओढ सुरू असताना नगर जिल्ह्यात मात्र बोकडांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. एरवी देवाला सोडलेले बोकड विकले अथवा कापले जातात. मात्र संगमनेर तालुक्यातील करूले येथे गहिनीनाथ महाराज देवाला सोडलेल्या बोकडाचा अकाली मृत्यू झाल्यानंतर काही कार्यकर्त्यांनी शुक्रवारी त्याच्यावर अंत्यसंस्कार करीत प्राणीमात्राविषयी असलेले प्रेम व्यक्त केले.

संगमनेर तालुक्यातील करुले गावातील ज्ञानदेव आहेर यांनी ग्रामदैवत गहिनीनाथ महाराजांच्या यात्रेच्या दिवशी चार वषार्चा असताना बोकड देवाला सोडला होता, मात्र विषबाधा झाल्याने बोकड बेशुद्ध पडला. त्याच्या तोंडातून अचानक फेस येत असल्याचे गावातील सामाजिक कार्यकर्ते अण्णासाहेब आहेर यांनी पाहिले. त्यानंतर त्यांचे बंधू सोमनाथ आहेर यांनी तात्काळ पशुवैद्यकीय केंद्राचे डॉ. थोरात यांना बोलविले. मात्र डॉक्टर येईपर्यंत बोकडाची प्राणज्योत मालवली होती. त्यानंतर अण्णासाहेब आहेर, सोमनाथ आहेर, कादरभाई पठाण, किशोर बर्डे व गणेश मोरे या तरुणांनी एकत्र येत बोकडाचा दफनविधी केला. ग्रामदैवत गहिनीनाथ महाराजांच्या मंदिराजवळ खडडा खोदून अंत्यविधी करून प्राणीमात्राविषयी असलेले प्रेम व्यक्त केले. या बोकडाचा ग्रामस्थांना चांगलाच लळा लागला होता. आता त्याच्या मृत्यूने ग्रामस्थांतून हळहळ व्यक्त होत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

“माझ्यावरील घोटाळ्याचे आरोप म्हणजे ठाकरे सरकारवरचे आरोप”, प्रताप सरनाईकांचं स्पष्टीकरण

News Desk

परळीत जनतेकडून सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा

News Desk

“उदय सामंत स्वतःच्या गाडीतून पाणी काढून देणार का” चिपळूण दौऱ्यावर असतांना निलेश राणे भडकले..!

News Desk
महाराष्ट्र

भाजप नेते कुलदिपसिंह ठाकूर यांच्या ‘कन्यादान’ पोस्टला प्रचंड प्रतिसाद

News Desk

पी. रामदास

लातूर – लातूरच्या शीतल वायाळ या तरूणीच्या आत्महत्येनं संपूर्ण राज्य सून्न झालं होतं. यापुढे अशा घटना घडू नये, यासाठी विविध स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. मात्र, लातूरच्या राजकारणातील धडाडीचं नेतृत्व असलेल्या भाजपच्या कुलदीपसिंह ठाकूर यांच्या ‘कन्यादान’ वरील एका फेसबुक पोस्ट सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. व्हाट्स अपच्या हजारो ग्रुपमध्येही भाजप नेते ठाकूर यांची ती पोस्ट मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतेयं… ज्या कारणासाठी ही पोस्ट होती, त्या मुलीच्या लग्नासाठी अनेकांनी पोस्ट वाचून मदत द्यायला सुरूवात केली आहे.

लातूर जिल्ह्यातल्या चाकुर तालुक्यातील मोहनाळ इथल्या राम फुलारी यांची मुलगी सोनालीचा विवाह नांदेड जिल्ह्यातल्या अभिजीत फुलारी यांच्याशी 18 मे रोजी होतोय. लग्नाचा अर्धा खर्च मुलीचे मामा नागनाथ फुलारी करत असून उर्वरित खर्चासाठी भाजप नेते कुलदीपसिंह ठाकूर यांनी पुढाकार घेतलाय. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी सोशल मीडियावर खालील पोस्ट टाकली आहे. ठाकूर हे या लग्नासाठी वैयक्तिक मदतही करणार आहेत. त्यांनी पोस्ट केलेली पोस्ट जशीच्या तशी खाली देत आहोत…

कुलदीपसिंह ठाकूर, नेते, भाजप, लातूर यांची फेसबुक पोस्ट …

“चला करू या कन्यादान,

एक विनम्र आवाहन”

“पुन्हा एखादी शीतल वायाळ जाण हि आमच्या असण्याच्या,

व सद्य समाजव्यवस्थेच्या गालावर सणसणीत चपराक बसण्यापूर्वीच,

अन् जीव गेल्यानंतर मदत करून मोठेपणा व बातम्या येण्यापेक्षा चला त्यापूर्वीच शक्य ती मदत करू…!

कु. सोनाली राम फुलारी रा.मोहनाळ ता.चाकुर या ऊपवर मुलीचे चि.अभिजीत अरूण फुलारी रा.वसमत जि.नांदेड यांचेशी लग्न जमले असून दि. १८मे.२०१७ रोजी विवाह मुहुर्तावरसंपन्न होणार आहे.

तिचे कुटूबिय अक्षरश: मोलमजूरी करणारे असल्याने आर्थिक परस्थिती अत्यंत हलाखीची आहे.म्हणून लग्नाचा अर्धा आर्थिक भार तिचे मामा श्री.नागनाथ फुलारी करीत आहे….व त्यांना बाकीचा खर्च भागविण्यासाठी आपल्या मदतीची गरज आहे…! आपण व आपल्यांकडुन आर्थिक सहकार्याची अपेक्षा.

चला आपण सारे मिळून भाऊ,दादा,मामा-मामी,

काका-काकू बनून हे “कन्यादान” पार पाडू,

मी माझ्याकडून शक्य ते सहकार्य केले आहे !आपणही आपला वाटा ऊचलावा हे विनम्र “आवाहन”!

आपला विनम्र !

ठाकूर कूलदिपसिंह ना.

संपर्क:-नागनाथ फुलारी

मोबाईल नं.9730545844

 

Related posts

मुंबईत सातत्याने कमी चाचण्यांमुळे मृत्यूसंख्येत होणारी वाढ चिंताजनक !

News Desk

वेळ पडली तर सरकार पुरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी कर्जही काढेल !

News Desk

मी गद्दार नाही, शिवसेनेचा खरा गद्दार अनिल परब आहे!; रामदास कदमांचा सवाल

Aprna