HW News Marathi
महाराष्ट्र

“उदय सामंत स्वतःच्या गाडीतून पाणी काढून देणार का” चिपळूण दौऱ्यावर असतांना निलेश राणे भडकले..!

चिपळूण। गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे संपूर्ण राज्यात हाहा:कार उडाला आहे. राज्यातील अनेक भागात पूर आला असून अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर आता राज्यातील सातारा, सांगली, कोल्हापूर, चिपळूण, आणि महाड मध्ये दरडी कोसळल्यानंतर दुर्घटनाग्रस्त भागात विरोधी पक्ष नेते आणि सत्ताधारी जाऊन पाहणी दौरा करत आहेत.

सामंतांच्या मागे फिरून काय मिळणार

याच पार्श्वभूमीवर आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र निलेश राणे आता चिपळूण दौऱ्यावर असताना अधिकाऱ्यांवर चांगलेच भडकलेले पाहायला मिळाले, फोनवरून निलेश राणे यांनी अधिका-यांना चांगलंच ठणकावल्याचं देखिल पहायला मिळाल, चिपळूणला ताबडतोब पाण्याचे टँकर पाठवावे अशी सक्त सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केलीये, इतकेच नव्हे तर उदय सामंत यांच्या मागे मागे फिरून काय मिळणार, असा सवालही राणे यांनी अधिकाऱ्यांना चिपळूणमध्ये उपस्थित केला आहे. लोकांचा जीव जातोय, व्यापारी रडत आहेत, प्यायला पाणी नाही, लोकांकडे अन्न नाही, टँकरची मागणी होत असतांना देखील पाणी नाही, म्हणून लोकांचे जीव तुम्हाला वाचवावे लागतील अस देखील राणे यावेळी म्हणाले. सामंत काय त्यांच्या गाडीतुन पाणी काढून देणार का? अशी संतप्त भावना देखिल निलेश राणे यांनी व्यक्त केली आहे.

मुख्यमंत्र्यांचा चिपळून दौरा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (२५ जुलै) पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी चिपळूणला गेले होते. यावेळी नागरिकांनी त्यांच्याकडे टाहो फोडला होता. काहीही करून आम्हाला वाचवा अशी विनंती मुख्यमंत्र्यांना केली होती. त्यांच्या व्यथा ऐकल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत महत्वाची माहिती दिली आहे.

“सरकार म्हणून जे काही करणं आवश्यक आहे ते आम्ही करू, नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत केली जाईल. मदत पुरवठा होताना कोणत्याही तांत्रिक अडचणी येऊ देणार नाही.जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांना तशा सूचना देखील दिल्या गेल्या आहेत. एकदा संपूर्ण आढावा आला की, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, सातारा, सांगली, कोल्हापूर या ठिकाणचा सगळा एकत्रित आढावा घेऊन आर्थिक मदत देखील दिली जाईल. असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जाहीर केलं आहे.”

राणे, फडणवीस, दरेकर कोकण दौरा

नारायण राणे हे आज कोकण दौऱ्यावर असून त्यांनी महाडयेथील तळीये गावातील दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी दुर्घटनाग्रस्तांचे पुनर्वसन करण्यात येईल. राज्य व केंद्र सरकार या ठिकाणी पुन्हा चांगल्याप्रकारे वसाहत बांधतील, असा शब्द राणेंनी दिला आहे.’या घटना घडल्यानंतर दुर्घटनाग्रस्तांना केंद्र आणि राज्य सरकारकडून मदत दिली जात आहे. त्या पलीकडे मदत होणार नाही असं नाहीये. दुर्घटनाग्रस्तांना पंतप्रधान आवास योजनेंतर्गंत पक्की घरं देण्याची योजना आहे, असं आश्वासन नारायण राणेंनी दिलं आहे. तसंच, एकच गोष्ट आम्हाला परत आणता येणार नाही ते म्हणजे मृत पावलेल्या लोकांना. पण जी लोक आहेत त्यांना मात्र आम्ही दिलासा देऊ शकतो, याची आम्हाला खात्री आहे,’ असं म्हणत दुर्घटनाग्रस्तांना राणेंनी धीर देण्याचा प्रयत्न केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महिलेवर सामूहिक बलात्कार , दोघाना अटक

News Desk

राज्यात गेला महिनाभर सुरु ‘कोरोना’चा हाहाकार

News Desk

मुख्यमंत्र्यांना आषाढी एकादशीची महापूजा करू देणार नाही | मराठा क्रांती मोर्चा

News Desk