HW News Marathi
महाराष्ट्र

गोरेगावच्या चाऊस हुक्का पार्लरमध्ये ‘काॅलगर्ल’ ?

पी. रामदास

मुंबई- गोरेगाव येथील लिंक रोड वरील चाऊस हुक्का पार्लर हे बेकायदेशीरपणे पहाटे चार पर्यंत सुरू असते. इतकच नाही तर हे पार्लर आता चक्क मुलींचा पिकपॉईंट म्हणून प्रसिध्द होत आहे. याविरोधात स्थानिकांनी तक्रार करूनही पोलिसांनी अद्याप त्या तक्रारीची दखल घेतली नाही. यापार्लरमधूनच आवडलेल्या मुलींना तरूण पैसे देऊन सोबत घेऊन जात असल्याची माहिती समोर आली आहे. वीकेंडला शनिवारी आणि रविवारी दोन दिवस या हुक्का पार्लरमध्ये तरूणांची गर्दी मोठयाप्रमाणावर असते याप्रकरणी अनेकदा पोलिसांत तक्रार करून देखील या पार्लर मात्र कोणतेही कारवाई होत नाही .यामुळे पोलिस या पार्लरला वाचवत आहे अशी चर्चा स्थानीय करत आहेत.

याची माहिती कंट्रोलरूमला देखील कळवण्यात आले आहे . मात्र या चाऊस हुका पार्लरला काही फरक पडलेलं नाही .यामुळे स्थानीक पोलिस आणि हुक्का पार्लरच्या मालकाशी लागेबांधे आहेत का असा प्रश्न उपस्थित होत आहे।

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

शरद पवार ४ वेळा मुख्यमंत्री होते, पण कधीच…! फडणवीसांनी डिवचलं

News Desk

छत्तीसगडमधील कांकेर येथे नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत बीएसएफचे ४ जवान शहीद

News Desk

राज्यातील जनतेची जबाबदारी माझ्यावर हे उघडा, ते उघडा सांगणाऱ्यांवर ती जबाबदारी नाही – मुख्यमंत्री

News Desk
महाराष्ट्र

१० रुपयाचे नाणे घेण्यास ग्रामीण भागातील बँकांचा नकार ,मॅनेजरने शेतक-याला बँकेतून बाहेर काढले.

News Desk

स्पेशल स्टोरी

उत्तम बाबळे

एस.बी.एच शाखा व्यवस्थापकाविरुद्ध कारवाई करण्याची शेतक-याची मागणी नांदेड:- भोकर तालुक्यातील माै.नागापुर येथील एक शेतकरी एस.बी.एच.शाखा भोकर येथे १० रुपयाचे १०० नाणे जमा करण्यासाठी गेला असता बँक शाखा व्यवस्थापकाने ते नाणे घेण्यास नकार देत शेतक-याला अपमानीत करुन बँकेबाहेर काढले असून त्या शेतक-याने हे नाणे जमा करुन सदरील व्यवस्थापकाविरुद्ध कार्यवाही व्हावी अशी मागणी केली आहे. खरीप हंगाम २०१७ सुरु झाला असून ग्रामीण भागातील शेतक-यांनी आपल्याकडील बचतीतून जी जमापुंजी जमवलेली आहे ती बाजार पेठेत आनून बी बियाणे ,खते खरेदी करत आहेत.याच अनुशंगाने माै.नागापुर येथील मारोती पोषट्टी बेरदेवाड हा शेतकरी त्यांच्या पत्नीने घरगुती वापरातून बचत केलेले १० रुपयाचे १००नाणे असे एकून १००० रुपये घेऊन २२ मे २०१७ रोजी बियाणे खरेदीसाठी भोकर येथे आला असता बाजार पेठेत त्यांचे ते नाणे कोणीही स्विकारले नाहीत.म्हणून त्याने त्या दिवशी ते नाणे भोकर येथील एस.बी.एच.शाखेतील त्याच्या खात्यात जमा करण्याचे ठरविले व रितसर बँकस्लीप भरुन रोकड जमा करण्याच्या खिडकीला गेले असता रोखपालाने ते नाणे जमा करुन घेण्यास नकार दिला.याबाबद बँक व्यस्थापकांना त्या शेतक-याने हे नाणे न स्विकारण्याचे कारण विचारले असता त्यांना योग्य उत्तर देण्याऐवजी अपमानीत करुन बँकेबाहेर हाकलून दिले.

वास्तविक पाहता आर.बी.आय.ने १० रुपयाचे नाणे चलनातून बाद केलेले नाही.तरी देखील काही व्यापारी व बँका ते स्विकारत नाहीत.” मै धारक को रुपये अदा करने का वचन देता हूँ! ” असे वचन आर.बी.आय.ने दिलेले असतांनाही ग्रामीण भागातील बँका हे ब्रीद विसरुन सामान्य नागरीक व शेतक-यांना नाहक त्रास देत आहेत.असाच त्रास मारोती बेरदेवाड यांना झाला असल्यामुळे त्यांनी बँक वरीष्ठ अधिकारी व शासनाकडे न्याय मागीतला असून त्यांना अपमानीत करणा-या त्या शाखा व्यवस्थापका विरुद्ध कार्यवाही करण्यात यावी म्हणून एका निवेदनाद्वारे भोकर उपविभागीय अधिकारी दीपाली मोतीयेळे यांच्याकडे मागणी केली आहे.वरीष्ठ अधिकारी याबाबद काय कार्यवाही करतील ? याकडे त्या गरीब शेतक-यांसह त्रास सहन करावा लागत असलेल्या अनेकांचे लक्ष लागले आहे.

Related posts

पंढरपूरच्या पायी वारीचा निकाल आज सर्वोच्च न्यायालयात!

News Desk

#CoronaVirus : केंद्राने राज्यातील सहा वैद्यकीय महाविद्यालयांना तातडीने चाचणीची परवानगी द्यावी, आरोग्यमंत्री

swarit

मुख्यमंत्र्याच्या भूमिकेविरोधात काँग्रेस नेत्याचं थेट राज्यपालांना पत्र

News Desk