HW News Marathi
महाराष्ट्र

जखमींना उपचारासाठी 30 हजार खर्च राज्यसरकार देणार

मुंबई दिवसेंदिव अपघाताचे प्रमाण वाढत आहेत अशा वेळी अनेकदा जखमींना वेळेवर उपचार मिळत नाही.यामुळे जखमीना जिव गमवावा लागतो. अशा वेळी जखमीवर वेळवर उपचार मिळावेत म्हणून राज्यसरकाने 30 हजार रूपये खर्च देण्याची योजना आखली आहे. अपघात झाल्यानंतर 48 तासात जखमींवर उपचारासाठी होणारा खर्च आता राज्यसरकार त्या जखमी व्यक्तील देणार आहे. यामुळे अनेकान या योजनेचा फायदा नवक्कीच होणार आहे. ही योजना येणा-या तीन महिण्यात लागु होणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. या योजनेचा प्रस्थाव वित विभागाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे विमा कवच असे या योजनेला नाव देण्याचे सरकार सकारात्मक आहे अशी माहिती मिळाली.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

केंद्राची जबाबदारी नाकारून भाजपने दिशाभूल करू नये: अशोक चव्हाण

News Desk

मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत १७८ महाविद्यालय प्राचार्य विना

Aprna

मुंबई पालिकेनं ३९,०३८ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला

News Desk
महाराष्ट्र

काँग्रेस उद्यापासून राज्यभर आंदोलन करणार

News Desk

रावसाहेब दानवेंची भाषा‘दानवा’सारखीः खा. अशोक चव्हाण

मुंबई राज्यातीलतूर उत्पादक शेतक-यांना शिवीगाळ करणारे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची भाषा दानवासारखी आहे, अशी खरमरीत टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.

मुंबई येथे पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी दानवे यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांची भाषा दानवासारखीच आहे. भाजप नेत्यांच्या डोक्यात सत्तेची नशा गेल्याने ते बेताल वक्तव्ये करित आहेत. राज्यातला तूर उत्पादक शेतकरी सध्या प्रचंड अडचणीत असून त्या शेतक-यांची सगळी तूर खरेदी करून शेतक-यांना दिलासा देण्याऐवजी शेतक-यांना शिवीगाळ करित आहेत. सत्तेची नशा भाजप नेत्यांच्या डोक्यात गेल्याने ते वारंवार शेतक-यांचा अवमान करत आहेत. आता तर शेतक-यांना शिवीगाळ करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. राज्यातले शेतकरी भाजप नेत्यांची ही नशा उतरवतील असे खा. अशोक चव्हाण म्हणाले.

शेतक-यांना साले म्हणून संबोधणा-या दानवे यांच्याविरोधात काँग्रेस पक्ष राज्यभरात आंदोलन करणार असून दानवे यांना “साला दानवे”अशी पदवी काँग्रेसकडून देण्यात येणार आहे. भाजपला थोडीही लाज असेल तर त्यांनी रावसाहेब दानवेंवर कारवाई करावी आणि राज्यातील शेतक-यांची माफी मागावी असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

Related posts

पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर दर्शनासाठी पुन्हा खुले!

News Desk

थकबाकी वसुलीसाठी सरकारकडून बाऊ केला जातोय – देवेंद्र फडणवीस

News Desk

कुणी कितीही टरटर केली तरी आकाश काही फाटणार नाही, पाऊसही पडणार नाही !

News Desk