HW News Marathi
महाराष्ट्र

ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकाची मुख्यमंत्री कार्यालयात अवहेलना

मुंबई। मला मुख्यमंत्र्यांना भेटायचे, म्हणून सुमारे साडेतीनशे किलोमीटर दूरवरून प्रवास करून आलेल्या लातूर जिल्ह्यातील एका ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकाला मुख्यमंत्री कार्यालयातील सुरक्षारक्षककडून दुय्यम वागणूक देण्यात आली. पिराजी महादू तोगरे (मु. पो. घोणशी, ता. जळकोट, जि. लातूर) असे या स्वातंत्र्यसैनिकाचे नाव असून त्यांनी मराठवाडा मुक्तिसंग्रामात हिरीरीने भाग घेतला होता. केंद्र पेन्शन आणि तामपत्र मिळावे, अशी त्यांची मागणी आहे.

स्वातंत्र्यसैनिक उच्चाधिकार समितीकडेही त्यांनी अनेकदा तक्रार केली. १९९४ मध्ये उच्च न्यायालयात रिट पिटिशनही दाखल केली. अगदी पंतप्रधान कार्यालयापर्यंत त्यांनी तक्रार केली; परंतु कुठेच न्याय मिळाला नाही, म्हणून मुख्यमंत्र्यांच्या कानी आपली तक्रार घालण्यासाठी त्यांनी मुंबई गाठली होती. परंतु त्यांच्या पदरी निराशा आली.

शुक्रवारी तोगरे थेट मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर धडकले. मुख्यमंत्र्यांना भेटल्याशिवाय हलणार नाही, असा पवित्रा घेत त्यांनी तेथचे ठिय्या मांडला. मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकाऱ्यांनी त्यांची मनधरणी केली. सुरक्षा रक्षकांनी त्यांना समजावले, पण ते कोणाचेच ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. दुपारी एक वाजेपर्यंत मुख्यमंत्री कार्यालयात होते. परंतु त्यांनी काही भेट दिली नाही. मुख्यमंत्री सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याच्या गोष्टी करतात. परंतु त्यांच्या दारी आलेल्या एका ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकाला साधी भेट दिली नाही. त्यामुळे त्यांच्या कारभाराविषयी सर्वसामान्यांच्या मनात संतापाचे वातावरण आहे.

– पिराजी तोगरे यांना सहा मुले अणि दोन मुली आहेत. राज्य सरकारची स्वातंत्र्यसैनिकाची पेन्शनही त्यांना मिळते, परंतु केंद्र सरकारची पेन्शन आणि ताम्रपत्र पुरस्कार मिळावा, यासाठी त्यांची धडपड सुरू आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘पंकजा मुंडे कधीच बंडाचा विचार करणार नाही’, चंद्रकांत पाटलांचा पंकजा मुंडेंवर विश्वास

News Desk

संयम कधी सोडायचा माहित आहे, पण गरज पडेल तेव्हा तलवारी काढू – संभाजीराजे 

News Desk

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात साकारणार “पुस्तकांचे गाव”; कॅबिनेट बैठकीतील निर्णय

News Desk