HW News Marathi
महाराष्ट्र

डाळींवरील साठवणुक मर्यादा हटवणार – रामविलास पासवान

नवी दिल्ली – सर्वसामान्यांसाठी दिलासा घेणारा निर्णय केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी घेतला आहे. सर्वप्रकारच्या डाळींवरच्या साठवणुकीच्या मर्यादा हटवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्रानं सर्व राज्य सरकारलाही यासंबंधी सूचना दिल्या आहेत. मात्र, साठवणूक निर्बंध मर्यादा हटवल्यानं डाळीचे दर पुन्हा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

केंद्रीय अन्न पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी या निर्णयाची माहिती ट्विटरवरुन दिली. ‘देशात मोठ्या प्रमाणात डाळींचं उत्पादन झालं असून सध्या डाळींना योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी डाळींच्या साठवणुकीवर लावण्यात आलेली मर्यादा तात्काळ हटवण्याचे आदेश देण्यात येत आहेत. तसेच सर्व राज्यांनाही त्यासंबंधी सूचना देण्यात आल्या आहेत.’ असं पासवान यांनी स्पष्ट केलं.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

ठाकरे गटाला मोठा धक्का! शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Aprna

प्रभाग क्रमांक २२ ची पोटनिवडणूक लढवणार नाही | मनसेने दाखवला आपला मोठेपणा

News Desk

… याचा अर्थ भाजपला लोकांनी नाकारले आहे; नवाब मलिकांचा हल्लाबोल

News Desk
महाराष्ट्र

केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांनी वाघाला दत्तक घेतले

News Desk

ठाकरे कुटुंबाचा टायगर तर आमचा पँथर – केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवले यांचे नेतृत्व भारतीय दलित पँथर या आक्रमक संघटनेतून उदयास आल्याने पँथर संघटनेवर त्यांचे अतूट प्रेम राहिले आहे त्यामुळे आज वन्य जीव दिनानिमित्त पँथर अर्थात बिबट्या वाघाला दत्तक घेतले

एका पँथर ने पँथर ला दत्तक घेण्याचा सोहळा पहण्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात प्राणी प्रेमी आणि पँथर प्रेमींनी मोठी गर्दी केली होती . ठाकरे कुटुंबाने सुद्धा यापूर्वीच टायगर दत्तक घेतला आहे त्याप्रमाणे आठवले कुटुंबाने पँथर दत्तक घेतला आहे

शिवसेनेचा टायगर आणि आरपीआय चा पँथर राजकीय जंगलात एकत्र आल्यावर संपूर्ण जंगलवर राज्यस्थापन करू शकतो याची प्रचिती शिवशक्ति भीमशक्ति च्या महायुतीतून मागे आम्ही दाखवून दिले आहे असे प्रतिपादन रिपाइं चे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी केले .

ना रामदास आठवले यांचे सुपुत्र कु जीत आठवले यांच्या पुढाकारातून हा बिबट्या अर्थात पँथर दत्तक घेण्यात आला . या पँथर चे नाव ” भीम ” असे ठेवण्यात आले आहे . या पँथर च्या वर्ष भराचा देखभाल खर्च 1लाख 20हजाराचा धनादेश दहिसर तालुका रिपाइं तर्फे देण्यात आला आहे .

तथागत बुद्धांनी मनवाने मानवावर प्रेम केले पाहिजे तसेच प्राणिमात्रांवरही प्रेम केले पाहिजे असा उपदेश केला आहे त्यानुसार बिबट्या अर्थात पँथर दत्तक घेण्यात येणार आहे हा पँथर शहापुर येथे एका नदित जख्मी अवस्थेत सापडला होता त्याची देखभाल आता संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात होत आहे असे ना रामदास आठवले यावेळी म्हणाले .

पूर्वी शिवसेनेच्या टायगर चे आणि दलित पँथर चे जमत नव्हते मोठा संघर्ष होत होता आता मात्र संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात ठाकरे कुटुंबाने घेतलेला टायगर आणि आम्ही घेतलेला पँथर एकत्र राहतील असेही ना आठवले म्हणाले . यावेळी सौ सीमाताई आठवले आणि कु जीत आठवले उपस्थित होते .

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या संयुक्त जयंती निमित्त अन्य कार्यक्रम करणे टाळून दहिसर रिपाइं तालुका अध्यक्ष दिलीप वाव्हले यांनी वन्यजीव दिनानिमित्त हा उपक्रम राबविला .

Related posts

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे पक्षावर नाराज?

News Desk

आमदार भारत भालके यांच्या निधनाने समाजातल्या दुर्बल घटकांसाठी झटणारा लोकप्रिय नेता गमावला – बाळासाहेब थोरात

News Desk

काळजीवाहू विरोधकांना मी भगव्याचे तेज दाखवणार; उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा

Aprna