HW News Marathi
महाराष्ट्र

नांदेड जि.परिषदेत फुले-आंबेडकरांवर श्रीपाल सबनिसांचं व्याख्यान

उत्तम बाबळे नांदेड :- नांदेड जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी भिम जयंती मंडळाच्या वतीने क्रांतीसुर्य राष्ट्रपिता महात्मा जोतिबा फुले व विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने प्रख्यात साहित्त्यीक अ.भा.मराठी साहित्य संम्मेलनाचे माजी अध्यक्ष जेष्ठ विचारवंत श्रीपाल सबनिस यांचे व्याख्यान आयोजित केले असून या कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

नांदेड जि.प.च्या यशवंतराव चव्हाण सभागृहात सायं.५:३० वाजता जि.प.अध्यक्षा श्रीमती शांताबाई पवार जवळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली व उपाध्यक्ष समाधान जाधव,मुख्यकार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे,सभापती माधवराव मिसाळे,सभापती दत्तात्रय रेड्डी,साै.मधुमती देशमुख कुंटूरकर,साै.शिलाताई निखाते आदींच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असून प्रख्यात साहित्त्यीक श्रीपाल सबनिस हे ” फुले – आंबेडकर यांची सामाजिक क्रांती आणि राष्ट्रीयत्व ” या विषयावर व्याख्यान देणार आहेत. तरी या कार्यक्रमामास बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जयंती मंडळाचे अध्यक्ष तुकाराम मोरे,सचिव सतिश कावडे,प्रसिद्धी प्रमुख मिलींद व्यवहारे,गणेश अंबेकर,यासह सर्व अधिकारी,कर्मचारी व जयंती मंडळ जि.प.नांदेड यांनी केले आहे.विनित सतिश कावडे,तुकाराम मोरे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

‘अल्लाह को पता था कोरोना आनेवाला है, इसलिए कब्रस्तान बना’, जितेंद्र आव्हाडांनी केले वादग्रस्त विधान

News Desk

गणेश चतुर्थीच्या बैठकीला राणे परिवाराला का बोलवलं नाही ?

News Desk

मुंबईत गेल्या पाच वर्षांपासून महिला अपहरणात वाढ | मुख्यमंत्री

News Desk
महाराष्ट्र

अंबाबाई… कर्जमाफीसाठी मुख्यमंत्र्यांना सुबुद्धी दे – अजित पवार

News Desk

कोल्हापूर – राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुबुद्धी दे, असं साकडं कोल्हापूरच्या अंबाबाईला घातल्याचं राष्ट्रवादीचे नेते आमदार अजित पवार यांनी प्रसार माध्यमांना सांगितले. विरोधी पक्षांच्या संघर्ष यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला आजपासून कोल्हापूरमधून सुरूवात झाली आहे. कोल्हापूरातील संघर्षयात्रेमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केंद्र व राज्य शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणावर टीका केली.

कर्जमाफीच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुबुद्धी दे ! असे साकडे कोल्हापूरच्या आंबाबाईला घातले आहे, असेही अजित पवार यांनी कोल्हापूरातील संघर्ष यात्रेमध्ये म्हटले. तुरडाळीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीसंदर्भात अजित पवार म्हणाले की, अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी तुरडाळ खरेदी करण्यामध्ये कमी पडल्याचे मान्य केले आहे. पण, शासनाला केवळ चूक मान्य करुन चालणार नाही तर तुरडाळ उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजे, असे ते म्हणाले. उत्तर प्रदेश सरकारने एका महिन्यात कर्जमाफी केली, मग राज्याच्या मुख्यमंत्र्यांना कर्जमाफीच्या अभ्यासासाठी अडीच वर्षे का लागतात? असा सवाल उपस्थित करत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.

सत्तेच्या जोरावर राज्य शासनाला शेतकऱ्यांची आंदोलने चिरडून टाकता येणार नाहीत, तुरडाळ संपेपर्यंच ती खरेदी केंद्राच्या माध्यमातून विकत घेण्याचा शब्द देऊनही राज्य शासनाने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला. शासनाने तुरडाळ केंद्रे त्वरित सुरु करुन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. अन्यथा राज्य शासनाविरुद्धचा संघर्ष आणखी तीव्र केला जाईल, असा इशारा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी कोल्हापूर पत्रकार परिषदेत दिला. विखे म्हणाले की,उत्तर प्रदेशप्रमाणे एक लाखापर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी मान्य नाही. त्यांचा सात बारा पूर्ण कोरा होईपर्यंत संघर्ष लढा सुरुच राहिल. १ मे राजी होणाऱ्या ग्रामसभेमध्ये शेतकऱ्यांचा सातबारा कोरा व्हावा आणि शेतीमालाला ५० टक्के नफा मिळावा या मागणीचा ठराव संमत करुन शासनाकडे पाठविणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

Related posts

सर्वांना प्रवासाची मुभा देण्यास आमची हरकत नाही मात्र… राज्य सरकारने दिले स्पष्टीकरण

News Desk

नारायण राणेंना पोलिसांकडून अटक!

News Desk

त्या मुलांची सीबीआय चौकशी झाली पाहिजे, प्रिया बेर्डेंची मागणी!

News Desk