HW News Marathi
महाराष्ट्र

नांदेड-मुंबई विमानसेवा 1 मे पासून सुरू

नांदेड – बहुचर्चित नांदेड-मुंबई-नांदेड विमानसेवा येत्या 1 मे पासून सुरू होणार आहे. देशाअंतर्गत विमानसेवेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंद पडलेल्या २४ विमानतळांचे पुनरुज्जीवन करण्याचे निर्देश दिले होते़ नांदेडसह सोलापूर, नाशिक, कोल्हापूर, जळगाव या शहरातील विमानसेवांचा समावेश आहे़ नांदेडात ट्रुजेट या कंपनीकडून येत्या २७ एप्रिलपासून नांदेड-हैद्राबाद, तर १ मे पासून नांदेड-मुंबई विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे़

श्री गुरू गोविंदसिंगजी विमानतळावरून तब्बल सात वर्षानंतर पुन्हा विमानसेवा सुरू होणार असून २७ एप्रिलपासून नांदेडहून दररोज विमान उड्डाण करणार आहेत़ ट्रुजेट कंपनीकडून ही सेवा सुरू करण्यात येणार असून विमानतळावर अत्यावश्यक सोयीसुविधांची पाहणी केल्यानंतर त्यासाठी प्रशासनाने कंपनीला हिरवा कंदील दाखविला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

महाराष्ट्र कर्नाटक सीमाभागात मराठी माणसांच्या समस्या सोडविल्या जातील! – मुख्यमंत्री

Aprna

बिहारकडे आम्ही लक्ष दिले नाही – शरद पवार

News Desk

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजी – माजी आमदार, पराभूत उमेदवारांची बैठक शरद पवारांच्या उपस्थितीत संपन्न!

News Desk
महाराष्ट्र

वक्फ मालमत्तेची माहिती द्या – प्रधान सचिव श्याम तागडे

News Desk

ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन च्या शिष्टमंडळाने घेतली भेट

मुंबई. वक्फ मालमत्तेचे दुसरे सर्वेक्षण सुरू झाले असून या सर्वेक्षण ला मुसलमान बांधवांनी सहकार्य करावे असे आव्हान अल्पसंख्यांक विकास विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे यांनी केले आहे. ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन च्या शिष्ठमंडळाशी बोलताना त्यांनी सांगितले.

समाजाला समजून समाजाच्या समस्या, मूळ प्रश्नाला समजून आपण काम करत आहात त्याबद्दल मुसलमान समाजाच्या वतीने अन्सारी यांनी तागडे यांचे धन्यवाद दिले. ‘तहरी के औकाफ’ आज संपूर्ण महाराष्ट्रात कशा पद्धतीने कार्यरत आहे याची माहिती दिली. तसेच ३ जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून ९२ हजार एकर जमीन असून १ लाख मालमत्ता हि वक्फ बोर्डाची असून त्यासाठी ४३ कर्मचारी त्यात ९ शिपाई, १ वाहन चालक आहे. तर एवढ्या मोठ्या कारभाराला हे कर्मचारी सांभाळू शकतात का असा प्रश्न उपस्थित केला होता. गोंदिया जिल्ह्यातून लोकं येतात नोंदणी चे २५०० प्रकरणे प्रलंबित आहेत. ते आजपर्यंत मार्गी लागत नाही. हेरिंग साठी कोण भेटत नाही, लोकं थकून गेली, हैराण झालेत, परेशान झालीत. यांची कैफियत मांडली होती. कर्मचाऱ्यांच्या अभाव असल्याने त्यासाठी ग्रँड दिली गेली पाहिजे, किमान ६ कार्यालय झाली पाहिजेत, तर मुख्यमंत्र्यांनी मुंबई, नागपूर, औरंगाबाद असे ३ कार्यालय देतो, तसेच ७७० कर्मचारी देखील देण्याचे कबुली दिली होती. तर १०० कोटींची ग्रँड मागणी केली असता २०० कोटी देणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले होते यावर लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी अशी अपेक्षा तागडे यांच्या कडे अन्सारी यांनी केली. वक्फ बोर्डात जर पहिल्या पासून चांगले काम झाले असते तर आज आम्ही खूप चांगले काम केले असते असे तागडे यांनी सांगितले. वक्फ बोर्ड हे वेल्टीलेटर आहे त्यात नक्कीच सुधार होईल असे आश्वासन अल्पसंख्यांक विकास विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे यांनी दिले. मालमत्तेचे जे दुसरे सर्वेक्षण सुरु आहे. त्याबद्दल तागडे यांनी आव्हान केले आहे की, समाजाच्या विविध संघटनांनी जिल्ह्यातील तालुका स्थरावर गावे-गावे फिरून लोकांशी चर्चा करून वक्फ मालमत्तेची माहिती घेऊन अतिरिक्त जिल्हाधिकारी पर्यंत ती पोहचावा जेणे करून परिपूर्ण सर्वेक्षण होण्यास मदत होईल तसेच त्यासंदर्भात मी स्वतः दौरा करणार असल्याचे तागडे यांनी सांगितले. त्यावर ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन चे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अन्सारी यांनी आमच्या कडून वक्फ संदर्भात जनजागृती मोहीम केली जात असल्याची माहिती दिली. यावेळी ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन सोलापूर चे अध्यक्ष इसाक खडके, मुल्ला मुलाणी समाजाचे अध्यक्ष शाहरुख मुलाणी, सइद खान, पुणे सदस्य सिराज शेख, सयेद शकील, परभणी चे अध्यक्ष सयेद फारूक, मिर्झाअब्दुल कय्युमनदवी आदी उपस्थित होते.

Related posts

सरकार स्थिर राहावं असं वाटत असेल तर…! यशोमती ठाकूर यांचा शरद पवारांना इशारा

News Desk

सोमय्यांनी कागदपत्रं दिल्यास उद्धव ठाकरेंची चौकशी होणार – मुख्यमंत्री

News Desk

‘संज्या मार खायच्या लायकीचा आहे, पण त्याचं संरक्षण वाढवलं’, निलेश राणेंची जबर टीका!

News Desk