HW News Marathi
महाराष्ट्र

निवडणुकीच्या तयारीला लागा-शरद पवार यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

मुंबई : केंद्र व राज्य सरकारच्या अनेक चुकीच्या धोरणामुळे जनमत सरकारविरोधी चालले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आतापासून कामाला लागावं असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिला आहे. मुंबईत शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीची बैठक पार पडली. त्यावेळी झालेल्या भाषणात पवारांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी तयार राहण्यास सांगितलं.जिथे भाजपची सत्ता आहे तिथे लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होऊ शकतात. त्यामुळे त्या दृष्टीने तयारीला लागा, असं आवाहन शरद पवारांनी केलं.

कर्जमाफी जाहीर केली, मग निकषाची भानगड कशाला?

शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरुनही शरद पवारांनी राज्य सरकारावर निशाणा साधला. मुख्यमंत्र्यांनी जर सरसकट कर्जमाफी जाहीर केली असेल तर निकष नावाची भानगड कशाला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

जपानची आर्थिक मंदी कमी करण्यासाठी भारतात बुलेट ट्रेन

सामान्य माणूस ज्यातून प्रवास करतो त्यामधील यातना कमी करण्यासाठी प्रयत्न होत नाही. पण बुलेट ट्रेनचे प्रोजेक्ट आणले जातात. जपानमध्ये आज आर्थिक मंदी आहे. सर्वात फास्ट ट्रेन ही जपानमध्ये आहे. फास्ट ट्रेनची कारखानदारी जपानमध्ये आहे, पण त्याला मार्केट नाही. जपान आर्थिक मंदी कमी करण्यासाठी आपल्याकडे बुलेट ट्रेनचा प्रोजेक्ट सुरु आहे, असं म्हणत शरद पवारांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

भाजपने नेहमीप्रमाणे इथंही श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये – रोहित पवार

News Desk

गांधींबद्दल वादग्रस्त ट्वीट प्रकरणी चौधरींची मंत्रालयातील पाणी पुरवठा विभागात बदली

News Desk

संभाजीराजे,पवारांच्या जवळ जायचं असेल तर जा पण मराठा आरक्षणाचा विषय स्वत:साठी वापरू नका !

News Desk
महाराष्ट्र

अठरा शेतक-यांच्या कुटुंबीयांना ३२ लाखांची मदत 

News Desk

मुंबई:-कापूस आणि सोयाबीन पिकांवर झालेल्या रोग, अळी आणि किडींच्या आक्रमणाचा सामना करण्यासाठी कीटकनाशकांची फवारणी करताना जीव गमावणा-या यवतमाळमधील १८ शेतक-यांच्या कुटुंबियांना राज्य सरकारने २ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

पिकावरील किडींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी फवारण्यात येणा-या कीटकनाशकाने शेतकरी आणि शेतमजुरांचा जीव घेतला आहे. यवतमाळ जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांत १८ शेतकºयांचा मृत्यू झाला. तर ७५० शेतक-यांवर उपचार सुरु असून २५ शेतक-यांना अंधत्व आले आहे.

यवतमाळमधील घटनेची शेतकरी संघटनांनी दखल घेत राज्य सरकारकडे पीडित शेतक-यांच्या कुटुंबियांना भरपाई देण्याची मागणी केली होती. शेतकºयांच्या मृत्यूला शासनाच्या कृषी आणि आरोग्य विभागाचा नाकर्तेपणा जबाबदार असल्याचा आरोप वसंतराव नाईक स्वावलंबी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केला होता. दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, सरकारी नोकरीमधून अधिकाºयांची हकालपट्टी करण्याची मागणीही त्यांनी केली होती.

Related posts

अमृता फडणवीसांचा खोचक सवाल तर आता रुपाली चाकणकरांचं प्रत्युत्तर!

News Desk

पंडित बिरजू महाराज निधन : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व अजित पवारांनी श्रद्धांजली वाहिली

News Desk

प्रताप सरनाईकांसह मुलगा विहंग सरनाईक आज ईडीसमोर हजर होणार

News Desk