HW News Marathi
महाराष्ट्र

नववी-दहावीत आता तोंडी परीक्षा नाही  

मुंबई : दहावी गुणांचा टक्का यंदा भलताच वाढला होता. शाळांकडून वाटली जाणारी तोंडी परीक्षेच्या गुणांची खैरात, क्रीडा गुण आदीमुळे अनेक विद्यार्थ्यांना १०० टक्केही गुण मिळाले होते. ही खैरात थांबविण्यासाठी नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यामुळे भाषा विषयांसाठीची २० मार्कांची तोंडी आणि ८० मार्कांची लेखी परीक्षा हा नियम बंद करण्याचा निर्णय राज्य शिक्षण मंडळाने गुरुवारी जाहीर केला आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या या निर्णयामुळे यंदा नववीच्या विद्यार्थ्यांना भाषा विषयांची १०० मार्कांची प्रश्नपत्रिका सोडवावी लागणार आहे. दरम्यान, हे बदल यंदा फक्त नववीसाठी असून याची दक्षता शाळांनी घेण्याची सूचनाही करण्यात आली आहे. राज्य शिक्षण मंडळाचा हा निर्णय पुढील शैक्षणिक वर्षांपासून दहावीसाठीही लागू होणार आहे. राज्य मंडळाच्या अधिकाऱ्यांची नुकतीच एक बैठक पुण्यात पार पडली होती. त्या बैठकीत परीक्षा पॅटर्न बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

‘दोन्ही काँग्रेसचा खरा चेहरा उघड झाला’, देवेंद्र फडणविसांची टीका!

News Desk

एकनाथ खडसे आणि नारायण राणे यांची केंद्रात वर्णी

News Desk

राज्य शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वेतन सुधारणेचा बक्षी समितीचा अहवाल स्वीकारला 

Aprna
क्राइम

11 कोटींचे डिल ठरले, 40 लाखांची लाचेची रक्कम स्वीकारून तो आला कॅमेरासमोर

News Desk

मुंबई- अंत्यत वादग्रस्त ठरलेल्या झोपु योजनेसाठी बिल्डर कोणत्या थराला जावू शकतात, याचा भंडाफोड संदीप येवले या तरुणाने केला. बिल्डरांकडून मिळालेली ४० लाखांची रोकड त्याने पत्रकार व कॅमेरासमोर आणून बिल्डरला तोंडघशी पाडले. हा सर्व प्रकार गैरव्यवहार उघड करू नये, म्हणून बिल्डरांनी केल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणीत अनेक बड्या अधिकारी व नेत्यांचा हात असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, बिल्डरांने आपल्याला ११ कोटी देण्याचे कबुल केले होते. त्यातील 40 लाखांची लाच दिल्याचे सामाजिक कार्यकर्ता संदीप याने पत्रकार परिषदेत जाहीर केले.

झोपडपट्टीवासीयांना पक्की घरे बांधून देण्याच्या बदल्यात बिल्डरांना प्रकल्प क्षेत्रावर वाढीव चटई क्षेत्र (एसएफआय) दिला जातो. राज्य सरकारच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या मुंबईतील एसआरए योजना अत्यंत वादग्रस्त ठरलेल्या आहेत. विक्रोळी पार्कसाइट येथील हनुमाननगर येथे एसआरए प्रकल्प चालू आहे. त्यासंदर्भात संदीप येवले याने माहिती अधिकारात (आरटीआय) सर्व माहिती जमा केली. ती माहिती प्रसिद्धी माध्यमांकडे देऊ नये यासाठी बिल्डराने संदीप येवले यांना एक कोटी रुपये देण्याचे मान्य केले.

Related posts

मीरा भाईंदरच्या काशीमिरामधून अमली पदार्थ तस्कराकडून 19 लाखांचे मेफेड्रोन (MD) जप्त

Chetan Kirdat

…मग मला घाबरण्याचे कारण काय ?

News Desk

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

News Desk