HW News Marathi
महाराष्ट्र

पुढील 48 तास महत्त्वाचे, या ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता!

मुंबई। राज्याला मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. आता पुढील 48 तास महत्त्वाचे आहेत. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणात अतिवृष्टीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, पावसाचा मराठवाड्याला जबरदस्त तडाखा बसला आहे. 10 जणांचा मृत्यू झाला असून 200 जनावरं दगावली आहेत. बीडमध्ये अनेक गावांचा संपर्क तुटला तर उस्मानाबादमध्ये पुरात अडकलेल्यांची हेलिकॉप्टरच्या मदतीने सुटका करण्यात आली आहे.राज्याला मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. आता पुढील 48 तास महत्त्वाचे आहेत. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणात अतिवृष्टीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, पावसाचा मराठवाड्याला जबरदस्त तडाखा बसला आहे. 10 जणांचा मृत्यू झाला असून 200 जनावरं दगावली आहेत. बीडमध्ये अनेक गावांचा संपर्क तुटला तर उस्मानाबादमध्ये पुरात अडकलेल्यांची हेलिकॉप्टरच्या मदतीने सुटका करण्यात आली आहे.

48 तास राज्यासाठी महत्त्वाचे आहेत

अरबी समुद्रात नवं वादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळेपुढील 48 तास राज्यासाठी महत्त्वाचे आहेत. गुलाब चक्रीवादळाचं तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात रुपांतर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले ‘गुलाब’ चक्रीवादळ निवळले असून त्याचं रुपांतर अती तीव्र अशा कमी दाबाच्या पट्ट्यात झाले आहे.

चक्रीवादळ तयार होण्याचा अंदाज आहे

त्यामुळे येत्या 24 तासात मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. उद्या हे कमी दाबाचे क्षेत्र अरबी समुद्रात प्रवेश करणार आहे.. अरबी समुद्रात त्याची तीव्रता पुन्हा वाढून नवे चक्रीवादळ तयार होण्याचा अंदाज आहे. अरबी समुद्रात नवे चक्रीवादळ तयार झाल्यास त्याचे नाव ‘शाहीन’ असणार आहे. या वादळामुळे राज्यातील अनेक भागात अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष पदी नाना पटोलेंची लागली वर्णी?

News Desk

अनाथांचा नाथ म्हणून पुढे या, कोरोनामुळे पालक गमावलेल्या 100 मुलांचं पालकत्व फडणवीसांनी स्वीकारलं

News Desk

भाजपने ‘जेल भरो’ आंदोलन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केले स्थगित

News Desk