HW News Marathi
महाराष्ट्र

बँकांची कामे उरका; चार दिवस बँका बंद

नाशिक : ज्यांची बँकांची कामे रखडली आहेत, त्यांनी लवकरात लवकर ती उरकून घ्या. पुढच्या आठवड्यातल्या सलग सुट्यांमुळे तब्बल चार दिवस बँका बंद राहणार आहेत. एका दिवसाच्या कामकाजानंतर पुन्हा सुटी मिळणार असल्याने पुढचा पूर्ण आठवडाचबँकांचे व्यवहार ठप्प राहण्याची शक्यता आहे.

१२ ऑगस्टला दुसरा शनिवार, १३ ला रविवार, १४ ला गोकुळाष्टमी व १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन असे चार दिवस बॅँकांचे कामकाज बंद असणार आहे. त्यामुळे बुधवारपासूनच अनेकांनी बॅँकिंग व्यवहार पूर्ण करण्यास सुरुवात केली आहे. १६ ऑगस्टलाकामकाजाचा दिवस आणि १७ ऑगस्टला पुन्हा पतेतीची सुटी आहे. त्यामुळे एक दिवस दांडी मारून बरेच जण सलग आठवड्याची सुटी घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यातच चालू महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातदेखील २५ ते २७ सलग तीन दिवस बॅँका बंद राहणार आहेत. २५ रोजी गणेश चतुर्थी, २६ रोजी चौथा शनिवार व २७ ला रविवार आहे. बॅँकांच्या या सलग सुट्यांमुळे आर्थिक व्यवहारांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

उद्धव ठाकरेंचा पंढरपूर दौरा रद्द, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार शासकीय महापूजा

News Desk

‘कोरोना पॉझिटिव्हिटी रेट कमी असलेल्या 25 जिल्ह्यात मोठी शिथिलता’, अशी असेल नियमावली!

News Desk

गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून ३ जणांची निर्घृण हत्या

News Desk
देश / विदेश

नागरिकतेवर प्रश्न उपस्थित करणे यासारखे दुर्दैव नाही – हमीद अन्सारी

News Desk

नवी दिल्ली – जमावांकडून एखाद्या निष्पाप व्यक्तीची निर्घृणपणे करण्यात येणारी हत्या, ‘घरवापसी’, यांसारख्या घटना घडत असतील, तर ही भारतीय मूल्य कमकुवत होत असल्याची लक्षणे आहेत. तुमच्या भारतीय नागरिकतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाणे, यासारखी दुसरी दुर्दैवी घटना नाही, अशा शब्दांत मावळते उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

सलग दुसऱ्यांदा उपराष्ट्रपतिपद भूषवलेल्या अन्सारी यांचा कार्यकाळ आज गुरुवारी संपत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यसभा टीव्हीने त्यांची मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी देशात सध्या सुरू असलेल्या घडामोडीवर भाष्य केले.

‘देशातील मुस्लिम समाजामध्ये सध्या भीती आणि असुरक्षेतेची भावना आहे. मुस्लिम समाजाकडे संशयाने पाहिले जाते. देशातील वेगवेगळ्या भागात मी गेलो, त्यावेळी मला असेच संशयाचे बोल ऐकायला मिळाले. बेंगळुरूला गेलो तेव्हाही मी हेच ऐकले आणि उत्तर भारतातून तर मोठ्या प्रमाणात असेचऐकायला मिळते,’ असेही अन्सारी म्हणाले. देशभर सुरू असलेल्या तीन तलाकवर बोलताना अन्सारी म्हणाले की, तीन तलाकच्या अनुचित प्रथेबद्दल दुमत होऊ शकत नाही. मात्र न्यायालयाने यात हस्तक्षेप करू नये, कारण कोणताही बदल समाजामधूनच होत असतो, असेही मत त्यांनी व्यक्त केले.

Related posts

धक्कादायक ! भारतीय बँकाच्या घोटाळ्यात ७२ टक्क्यांनी वाढ

News Desk

“कलम ३७० रद्द करुनही जम्मू-काश्मीरची समस्या सुटलेली नाही” – मोहन भागवत

News Desk

गुगलचा जाहीर माफीनामा

News Desk