HW News Marathi
महाराष्ट्र

बंद पडलेले नाफेड तुर खरेदी केंद्र त्वरीत सुरू करा अन्यथा तीव्र आंदोलन करु

उत्तम बाबळे

नांदेड : – नांदेड व धर्माबाद येथील नाफेडचे तूर खरेदी गेल्या १० दिवसांपासून बंद असल्यामुळे शेतक-यांना नाहक त्रास सहन करावा लागत असून आर्थीक झळ ही सोसावी लागत आहे.त्यामुळे ही तूूर खरेदीकेंद्र त्वरीत सूरु करुन शेतक-यांना न्याय द्यावा अन्यथा तीव्र आंदोलन करु असा इशारा आम आदमी पार्टीच्या वतीने देण्यात आला आहे. जिल्ह्यातील नाफेडचे आणि केंद्र व राज्य शासनाच्या विरूद्ध यंत्रणेच्या सहायाने जी तूर खरेदीकेंद्र चालतात ती खरेदी केंद्र वेळोवेळी ऐनकेन कारणांनी वेळोवेळी बंद पडत आहेत. धर्माबादचे तूर खरेदीकेंद्र मागील १० दिवसापासून वेअरहाऊस उपलब्ध नाही म्हणून बंद आहे तर नांदेडचे खरेदीकेंद्र बारदाना नाही म्ळणून बंद पडले आहे. शेतकर्च्याउत्पादनाला मिळणारी आधारभूत किंमत म्हणजे नफा पुरवणे नाही तर नुकसान कमी करणे किंवा नुकसाणीतून मुक्त करने होय. हमी व योग्य भाव मिळावा म्हणुनच ही खरेदी केंद्र सूरु केली आहेत. परंतू ती केंद्र बंद पडली आहेत.त्यामुळे शेतक-यांचे हाल होत आहेत. तात्काळ ती तुर खरेदी केंद्र सुरू करावेत. काही कारनाने ही बंद पडली आहेत.तूर खरेदी केंद्रांवर माल खरेदीसाठी मर्यादीत कालावधी देण्यात आला आहे.त्याच मुद्दत काळातील १० दिवस बंदमुळे वाया गेली आहेत.ही सर्वस्वी जबाबदारी तूर खरेदीकेंद्र चालक,नाफेड,केंद्र व राज्य शासनाची आहे.म्हणुन वाया गेलेला कार्यकाळ मुद्दतवाढ करुन भरुन काढावा व ती केंद्र बंद पडलेल्या काळातील दिवसांनूसार मुदत वाढवून मिळावी. असे न केल्यास किंवा मागण्या मान्य न झाल्यास आम आदमी पार्टीच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा एका निवेदनातून जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आला आहे. या निवेदनावर आम आदमी पार्टीचे फारूख अहमद, बालाजी आबादार, ज्ञानेश्वर कदम, सरोज पेठे, गुलाब जोगदंड, आनंद कदम, मो.कासिम, शिल्पा पोटलाार, मुंजाजी व्यवहारे यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

पालघर, पुण्यात आज जोरदार पावसाचा अंदाज!

News Desk

महाराष्ट्रात आणीबाणी लावा! महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्याने लिहिलं चक्क मोदींना पत्र

News Desk

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची समिती यादी जाहीर

News Desk
देश / विदेश

माझा छळ कशासाठी?

News Desk

नव्या व्हीडिओतून तेज बहादूरचा सवाल

नवी दिल्ली – निकृष्ट दर्जाचं जेवण मिळत असल्याची तक्रार करणारा व्हीडिओ व्हायरल झाल्याने बीएसएफ कॉन्स्टेबल तेज बहादूर यादव चर्चेत आले होते. त्यांचा नवा व्हीडिओ आता समोर आला आहे. या वेळी तेज बहादूर यांनी ‘सत्य समोर आणल्याने छळ होत असल्याचा आरोप केला असून आपण न्यायास पात्र नाही का ?’ असा सवाल थेट पंतप्रधानन नरेंद्र मोदींना केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भ्रष्टाचाराशी लढा देण्याचं आवाहन केलं. त्यामुळे माझ्या खात्यातला भ्रष्टाचार मी उघडकीस आणला. मग माझा छळ का केला जातोय, हा सवाल सर्वांनी माझ्यावतीने पंतप्रधान मोदींना विचारावा’, असं आवाहन तेज बहादूर यादव यांनी या व्हीडिओच्या माध्यमातून केलंय. यादव यांच्या कुटुंबाने हा व्हीडिओ शूट करुन अपलोड केल्याची माहिती आहे.

माझ्याबाबतीत पसरवल्या जात असलेल्या अफवावंर विश्वास ठेवू नका’, असंही तेज बहादूर यादव यांनी व्हीडिओत म्हटलंय. पाकिस्तानकडून तेज बहादूर यादव यांचा वापर केला जात असल्याचं बोललं जात होतं. तेज बहादूर यादव यांचे फेसबुकवर मोठ्या प्रमाणत पाकिस्तानी मित्र असल्याचंही समोर आलं होतं. हाच मुद्दा उचलून धरत अनेकांनी त्यांच्यावर टीका केली होती. यादव यांचा पहिला व्हीडिओ तब्बल 9.9 दशलक्ष लोकांनी पाहिला आणि 4.4 लाख लोकांनी शेअर केला होता. तेज बहादूर यादव यांचा फोन बीएसएफकडून पुरावा म्हणून जप्त करण्यात आल्यानंतर आणि त्यांची बदली केल्यानंतर पत्नी शर्मिला देवी यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांना भेटण्याची परवानगी देण्यात आली होती. नव्या व्हीडिओत आपल्या तक्रार आणि आरोपांचा अधिकाऱ्यांनी व्यवस्थित तपास केला नसल्याचंही यादव म्हणतायत.

Related posts

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी दीड वर्षातच दिला राजीनामा

swarit

ज्येष्ठ दिग्गज उद्योजक राहुल बजाज अनंतात विलीन

Aprna

कपडे बदलताय, जरा सावधान, छुप्या कॅमेरांची असते तुमच्यावर नजर

News Desk