HW News Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्रात आणीबाणी लावा! महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्याने लिहिलं चक्क मोदींना पत्र

नागपूर | कोरोनाच्या उद्रेकामुळे महाराष्ट्रातील परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत चालली आहे. याचा परिणाम राज्याच्या आरोग्य यंत्रणेवर होताना दिसत आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात आर्थिक व आरोग्य आणीबाणी लागू करावी, अशी मागणी थेट मागणी काँग्रेस नेते आणि माजी आमदार आशिष देशमुख यांनी केली आहे. तसे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांनी पत्रही पाठवले आहे.

कॉंग्रेस नेते आशिष देशमुख यांच्या या घरच्या आहेरामुळे आता विरोधकांच्या हाती आयतं कोलीतच आल्याचे दिसून आले आहे. आशिष देशमुख यांनी आपल्या पत्रात राज्यातील कोरोना नियंत्रणात आणण्यात राज्य सरकारचे प्रयत्न अपुरे पडत असल्याचे म्हटले आहे. राज्यात कोरोनामुळे ६० हजारांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे संविधानाच्या कलम ३६० अन्वये महाराष्ट्रात दोन महिन्यांची आणीबाणी लावण्यात लागू करावी. अशीच परिस्थिती राहिली तर लोक रस्त्यावर उतरतील, अशी भीतीही आशिष देशमुख यांनी पत्रातून व्यक्त केली आहे.

तर, राज्यात कोरोनाचा हाहा:कार पाहायला मिळत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक निर्बंध लागू राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. मात्र तरीही रुग्णसंख्या आटोक्यात येत नसल्याने राज्यातील लॉकडाऊनचे नियम आणखी कठोर केले जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्रात आज कडक लॉकडाऊनची घोषणा करतील, अशी चर्चा सुरु आहे. तर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले या सगळ्यावर काय प्रतिक्रिया देणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विकास कामांमध्ये राजकारण नको, अजित पवारांची मेट्रो कारशेडवर प्रतिक्रिया

News Desk

आरोपीच्या सांगण्यावरून कारवाई कशी होऊ शकते? हसन मुश्रीफ यांचा ईडीला सवाल

News Desk

तर मी मुंबई कायमची सोडून जाईन,कंगणाचं गृहमंत्री अनिल देशमुखांना चॅलेंज

News Desk