HW News Marathi
महाराष्ट्र

भय्यु महाराजाने उभारलेल्या त्या स्मारकाला विरोध

औऱंगाबाद- संपूर्ण देशभर गाजलेल्या कोपर्डी येथील बलात्कार व हत्याकांडाचे राजकारण केले जात असून त्याला तिव्र विरोध होत आहे. कोपर्डी घटनेला एक वर्षे पूर्ण झाले असून या घटनेत बळी पडलेल्या निर्भयाचे स्मारक उभारण्याचा घाट आध्यत्मिक गुरू भय्यु महाराज यांनी आखला असून त्याला संभाजी ब्रिगेडने तिव्र विरोध दर्शवला आहे.

संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ता डॉ. शिवानंद भानुसे यांनी पत्रक काढून स्मारकाला विरोध दर्शवला आहे. कथित संत भय्यू महाराज कोपर्डीत पीडितेचे स्मारक उभारून ऐतिहासिक मराठा क्रांती मोर्चाचे श्रेय घेण्याचा बालिश प्रयत्न करत आहेत. स्मारके शौर्य पराक्रमाची आठवण करून देण्यासाठी असतात. कोपर्डीत जे घडले त्याने प्रत्येक माणसाची मान शरमेने खाली गेली आहे. अशा घटनेचे स्मारक उभारून माणुसकीला काळीमा फासण्याचे काम करू नये, अशी ब्रिगेडची भूमिका आहे. दरम्यान, कोपर्डी प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात घेऊन लवकरात लवकर आरोपींना फाशी देण्यासाठी सरकार प्रयत्न करेल, असे मुख्यमंत्री म्हणाले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

ग्रामपंचायत निवडणुकीत कोणाची जीत कोणाची हार?

News Desk

होय कर्जमाफीची घाई केली…त्यामुळेच चूका !

News Desk

कोर्टाच्या निकालावर राजकीय प्रतिक्रिया देणं योग्य नाही – संजय राऊत

News Desk
क्राइम

11 कोटींचे डिल ठरले, 40 लाखांची लाचेची रक्कम स्वीकारून तो आला कॅमेरासमोर

News Desk

मुंबई- अंत्यत वादग्रस्त ठरलेल्या झोपु योजनेसाठी बिल्डर कोणत्या थराला जावू शकतात, याचा भंडाफोड संदीप येवले या तरुणाने केला. बिल्डरांकडून मिळालेली ४० लाखांची रोकड त्याने पत्रकार व कॅमेरासमोर आणून बिल्डरला तोंडघशी पाडले. हा सर्व प्रकार गैरव्यवहार उघड करू नये, म्हणून बिल्डरांनी केल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणीत अनेक बड्या अधिकारी व नेत्यांचा हात असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, बिल्डरांने आपल्याला ११ कोटी देण्याचे कबुल केले होते. त्यातील 40 लाखांची लाच दिल्याचे सामाजिक कार्यकर्ता संदीप याने पत्रकार परिषदेत जाहीर केले.

झोपडपट्टीवासीयांना पक्की घरे बांधून देण्याच्या बदल्यात बिल्डरांना प्रकल्प क्षेत्रावर वाढीव चटई क्षेत्र (एसएफआय) दिला जातो. राज्य सरकारच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या मुंबईतील एसआरए योजना अत्यंत वादग्रस्त ठरलेल्या आहेत. विक्रोळी पार्कसाइट येथील हनुमाननगर येथे एसआरए प्रकल्प चालू आहे. त्यासंदर्भात संदीप येवले याने माहिती अधिकारात (आरटीआय) सर्व माहिती जमा केली. ती माहिती प्रसिद्धी माध्यमांकडे देऊ नये यासाठी बिल्डराने संदीप येवले यांना एक कोटी रुपये देण्याचे मान्य केले.

Related posts

उदय सामंत आणि संभाजी राजेंच्या बोटीला अपघात; सुखरुप बचावले

Aprna

नांदेड जिल्ह्यात ८ एप्रिल रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन

News Desk

प्रियकराला भेण्यसाठी पतीने विरोध केला म्हणून पत्नीने पतीचा काटा काढला

News Desk