HW News Marathi
महाराष्ट्र

होय कर्जमाफीची घाई केली…त्यामुळेच चूका !

मुंबई – कर्जमाफीची घाई केल्या मुळे चुका झाल्या आणि शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होवू शकले नाही याची स्पष्ट कबूली सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी देत सरकारचे अपयशयच समोर आणले. शेतकऱ्यांची खातीही गेल्या 40 वर्षा पासूनची आहेत. त्यामुळे एेवढं मोठं काम करताना चुका ह्या होणारच असे सांगत त्यांनी सारवा सारव करण्याचा प्रयत्नही केला. शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास काही तांत्रिक अडचणी येत होत्या. शिवाय एकाच क्रमांकाची आधार कार्ड अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर होती. या बाबत आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर राज्यातील बँकर्स समिती आणि माहिती तंत्रज्ञान विभाग यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. ही बैठक झाल्यानंतर ते बोलत होते.

शेतकऱ्यांनी कोणतीही चुकीची माहिती दिली नाही. तर बँकाकडून आलेली माहिती चुकीची होती अशी माहितीही देशमुख यांनी दिली. दरम्यान कर्जमाफीची रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा करण्यासाठी पहिल्या टप्प्याच्या ग्रीन लिस्टमध्ये ज्या तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या त्यावर माहिती व तंत्रज्ञान विभाग आणि बॅंकांच्या चमुंनी एकत्रित बसून तोडगा काढावा. ह्या यादीतील बिनचूक माहिती असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर उद्यापासून रक्कम जमा करण्यास सुरूवात करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उस्मानाबादमध्ये अजित पवारांनी घडवलं माणुसकीच दर्शन

News Desk

नको ‘त्या’ गोष्टी लोकांच्या मनात आणून जातीय तेढ निर्माण केल्याचा प्रयत्न, अजित पवारांची पंतप्रधानांवर टीका

Aprna

उन्हाळ्याची सुट्टी रद्द करा… शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडूंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

News Desk