HW News Marathi
महाराष्ट्र

मुखेडमध्ये खिचडी खाल्याने 29 विद्यार्थ्यांना विषबाधा

मुखेड तालुक्यातील राजूरा तांडा येथील जि. प. च्या शाळेतील घटना

कुवरचंद मलकुलाल मडंले

मुखेड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजूरा तांडा येथील शाळेमधील खिचडीतून विषबाधा झाल्याने परिसरात विद्यार्थी व पालक वर्गामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.दररोजच्या प्रमाणे शाळेमध्ये दुपारी 1 वाजताम मध्यान्ह भोजनाची वेळ असते. (6 जानेवारी) रोजी शाळेतील मुलांनी रोजच्या प्रमाणे दुपारी 1 वाजता खिचडी खाल्याने लगेचच त्यांना मळमळ होवून उलट्या करत होते. राजूरा तांडा येथील पालक वर्ग भयभीत झाले आहेत. तब्बल 29 जणांना विषबाधा झाल्याचे समजले तात्काळ मुख्याध्यापक पिंजारी ए. जे. व गावातील ग्रामस्थ आणि शाळेवरील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना तात्काळ मुखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले असता डॉक्टरानी खिडीतून विषबाधा झाल्याचे सांगितले असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार चालू आहेत. राजूरातांडा या शाळेमध्ये एकुण 32 विद्यार्थी संख्या असून त्यापैकी 29 विद्यार्थी उपस्थित होते. व 3 विद्यार्थी अनुउपस्थित होते. 29 विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार चालू असून खिचडी बनवणा-या बाईने व्यवस्थितरित्या खिचडी केली की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. खिचडी बनवणारया बाईचे नाव रतनबाई राठोड असून त्या दररोज शाळेमध्ये खिचडी बनवतात पण अशा या घटनेमुळे मुखेड तालुक्यातील सर्वच विद्यार्थी व पालक वर्गामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात २०२० मध्ये १ लाख ९९ हजार बेरोजगारांना रोजगार-नवाब मलिक

News Desk

अॅपे रिक्षातून पडून विद्यार्थ्यीनीचा मृत्यू

News Desk

निवडणुकीच्या तयारीला लागा-शरद पवार यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

News Desk