HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्री टाळणार खासगी हेलिकॉप्टरने प्रवास

मुंबई: व्हीआयपी व्यक्तींच्या सुरक्षेचे मार्गदर्शक तत्त्वे आणखी काटेकोर करुन निर्णय घेणार असल्याचे नागरी हवाई वाहतूक महासंचलनालयाकडून (डीजीसीए) सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर, डीजीसीएकडून रायगड हेलिकॉप्टर प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. सुरक्षेत काही चूक झाली का, याचा तपास होणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री यापुढे खासगी हेलिकॉप्टरमधून प्रवास करणार नसल्याची सूत्रांची माहिती आहे.

रायगड जिल्ह्यााील अलिबाग इथं मुख्यमंत्री आज एका कार्यक्रमासाठी गेले होते. त्यावेळी हेलिकॉप्टरचा पंखा त्यांच्या डोक्याला लागत होता. मात्र उपस्थित सुरक्षारक्षक आणि अधिकाºयांनी प्रसंगावाधन दाखवल्याने मोठा अनर्थ टळला. अशीच घटना गेल्या महिन्यात लातूर जिल्ह्यातील निलंगा येथे घडली होती.

रायगड येथे मुख्यमंत्री हेलिकॉप्टरमध्ये चढत असतानाच हेलिकॉप्टरने टेक आॅफ अर्थात उड्डाणास सुरुवात केली. त्यावेळी मुख्यमंत्री हेलिकॉप्टरच्या वेगाने फिरणा- या पंख्याखाली होते. हा पंखा मुख्यमंत्र्यांच्या डोक्याला लागण्याची शक्यता अधिक होती. मात्र तिथे उपस्थित वरिष्ठ सुरक्षा रक्षक आणि पोलीस अधिकाºयांनी त्यांना बाजूला घेतल्याने ते थोडक्यात बचावले. या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष देण्याचे आदेश केंद्राकडून प्राप्त झाले आहे. त्यानुसार या पुढे मुख्यमंत्री खासगी हेलिकॉप्टर वापरणार नसल्याचे समजते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

रासपचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या गंगाखेडच्या मालमत्तेवर ईडीचा छापा!

News Desk

पंढरपूर पोटनिवडणूकीत ‘या’ उमेदवारांची माघार!

News Desk

कार्यकर्त्याच्या बाईकवरुन तीन किमी प्रवास करत जयंत पाटलांनी केली तलावाची पाहणी!

News Desk
Uncategorized

रवी शास्रींच्या नावाला सर्वाधिक पसंती

News Desk

मुंबईः भारतीय क्रिकेट संघाचे कोच म्हणून रवी शास्री यांच्या नावाला सर्वाधिक पसंती मिळत असल्याचे सूत्राची माहीती आहे. या पदासाठी सहा जण इच्छुक आहे. खरं तर रवि शास्री कोच पदासाठी इच्छुक नव्हते. परंतु कोच पदासाठी अर्ज भरण्याची मुदत वाढवल्यानंतर शास्री यांच्या नावाची चर्चा वाढली आहे, दहा अर्जापैकी सहा जणांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. त्यामध्ये रवी शास्री, विरेंद्र सेहवाग, मुडी, सीमन्स, पायबस, राजपूत यांच्याच मुलाखत होण्याची शक्यता आहे. स्काइपीवरून रवी शास्री यांची मुलाखत देखील झाल्याचे वृत्त सध्या वायरल झाले आहे. त्यामुळे भारतीय कोच म्हणून रवी शास्री यांचे नाव निश्चित मानले जात आहे. अनिल कुंबळे यांनी राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त आहे.

 

Related posts

अजित पवारांवर वेब सीरिज केल्यास ३०० कोटी रॉयल्टी मिळेल, सोमय्यांची खोचक टीका

News Desk

म्यूझीक कंपन्यांच्या मागे ईडीचा ससेमिरा

News Desk

Manasi Devkar