HW News Marathi
महाराष्ट्र

माजी मंत्री गावितांनी निवडणूक आयोगापासून लपविली माहिती

 

निवडणूक आयोगाकडे तक्रार

Gavit Election Complaint

महाराष्ट्रातील नंदुरबार(अ.ज.) विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले भाजपाचे आमदार डॉ विजयकुमार गावित यांनी उमेदवारी अर्ज सादर करताना दायित्वा अंतर्गत शासकीय देणीबाबत माहिती दडविल्याचा आरोप करत आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी याबाबत मुख्य निवडणूक अधिकारी यांस तक्रार दाखल केली आहे. गावित यांनी मंत्री पद सोडल्यापासून शासकीय दंडाची तब्बल 44 लाख रक्कम अदा केली नसल्याचा आरोप त्यांसवर आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांस केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की वर्ष 2014 च्या विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगास सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात शासकीय देणीच्या माहितीत निरंक असा शब्द लिहिला आहे. प्रत्यक्षात त्यांस 20 मार्च 2014 रोजी मंत्रिमंडळातून वगळल्यानंतर शासकीय निवासस्थान ‘सुरुचि’ रिक्त केला नाही. 25 सष्टेंबर 2014 रोजी निवडणूक प्रतिज्ञापत्रात गावितांनी सदनिकापोटी देय रक्कमेच्या माहितीच्या रकान्यापुढे निरंक असा शब्द लिहिला. मंत्रिपदावरुन वगळल्यानंतर ते निवडणूक अर्ज सादर करेपर्यंत गावितांनी निवासस्थान सोडले नाही ना देणी अदा केली नाही. दायित्वा अंतर्गत शासकीय देणी असताना त्याचा उल्लेख न करता ती माहिती दडविल्याचा आरोप गलगली यांनी करत गावितांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली आहे. या तक्रारीची प्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांस सुद्धा केली आहे. यासंदर्भात डॉ. गावित यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

संभाजीराजेंची खासदार निधीतून पूरग्रस्तांना ५ कोटींची मदत

News Desk

भाजप नेते गिरीश महाजन यांच्या विरोधात खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल

News Desk

आषाढी एकादशीच्या दिवशी तीन तास विठ्ठल दर्शन रहाणार बंद

News Desk
महाराष्ट्र

युतीचा निर्णय मी आणि मुख्यमंत्री फडणवीस मिळून घेऊ – उद्धव ठाकरे

News Desk

शुभम देशमाने – 8689820571

मुंबई – आगामी निवडणुकांमध्ये भाजपसोबत युती करायची की नाही, याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी मिळून घेऊ, असे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. युतीबाबत आजपासून चर्चेची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.

आगामी जिल्हापरिषद, पंचायत समिती आणि महापालिका निवडणुकांबाबत शिवसेना-भाजपमध्ये युतीबाबत अनेक तर्कवितर्कांना सुरूवात झाली आहे. त्याबाबत उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, शिवसेना-भाजपकडून प्रत्येकी तीन सदस्य युतीबाबत चर्चा करतील. जिल्हा परिषद निवडणुकीत युतीचे अधिकार स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांना देण्यात येणार आहेत. आज निवडणुका जाहीर होणार असल्याने लवकरात लवकर चर्चा झाली तर ठीक नाहीतर कुठेतरी थांबवून एक निर्णय घ्यावा लागेल, अशी सूचनावजा इशाराही उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिला आहे. युतीबाबत अजून माझ्यापर्यंत काही आलेले नाही त्यामुळे शिवसेनेची निवडणुकीची तयारी सुरू असल्याचे उद्धव यांनी सांगितले.

उद्धव यांचा राज ठाकरेंना टोला

महापालिका निवडणुकीत युती करण्याबाबत मनसे प्रमुख राज ठाकरेंनी अनुकूलता दर्शवत भाजप हा आमचा शत्रू असल्याचे वक्तव्य केले आहे. त्याबाबत विचारले असता उद्धव म्हणाले, शिवसेनेबद्दल अनेकांच्या मनात गैरसमज होते ते दूर होत आहेत, ही चांगली गोष्ट आहे.

 

 

 

 

Related posts

बारावीच्या विद्यार्थ्यांचे रोल नंबर जारी, निकाल कधी लागणार विद्यार्थ्यांचं लागलं लक्ष

News Desk

सोशल मीडियाला संपवणं, लोकांना तुरुंगात टाकणं हाच केंद्राचा डाव, राष्ट्रवादीचा आरोप

News Desk

पाचच काय, तर पुढचे २५ वर्ष शिवसेनेचाच मुख्यमंत्री असेल !

News Desk