HW News Marathi
महाराष्ट्र

बोगस मतदानाची शक्यता ?

उल्हासनगरातील मतदार यादयांत दुबार,स्थलांतरित मतदारांचा भरणा !

गौतम वाघ

उल्हासनगर-21 फेब्रुवारीला उल्हासनगर महानगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजला आहे.त्यानुषंघाने मतदार यादया जाहीर झाल्या आहेत.त्यात दुबार,स्थलांतरित,हयात नसलेल्या मतदारांच्या नावांचा भरणा आहे.त्यामुळे पॅनल पद्धतीत बोगस मतदान होण्याची शक्यता असल्याचे स्पष्ट मत शिवसैनिक,उद्योगपती विजय ठाकूर यांनी व्यक्त केले आहे.याबाबत तक्रार उपविभागीय अधिकारी विजया जाधव, तहसीलदार उत्तम कुंभार यांच्या करणार असून बोगस मतदान टाळण्यासाठी हि नावे वगळण्याची मागणी करणार.असेही विजय ठाकूर यांनी सांगितले.

उल्हासनगरात 78 वॉर्ड असून त्यानुसार चार वार्डांचा एक पॅनल मिळून 19 पॅनल तयार करण्यात आले आहेत.या टोकातून त्या टोका पर्यंत अनोळखी मतदारांचा सामना किंबहुना ओळख करण्यासाठी उमेदवारांवर कसरत करण्याची वेळ येणार आहे.मतदानाचे अनेक बूथ असणार आहेत.सुमारे 15 ते 20 हजार मतदारात जी दुबार,स्थलांतरित नावे आहेत,त्यांच्या नावावर बोगस मतदान होण्याची शक्यता अधिक आहे.याशिवाय मतदार यादीत ज्या परिसरात नागरिक राहतो,त्यांची नावे त्याऐवजी दुस-या परिसरात दिसतात.पतीचे नाव फोटो नंतर एकाच परिवारातील नावे सलग असणे अपेक्षित होते.पण हि नावे वेगवेगळ्या पानांवर असल्याने ती शोधताना तारांबळ उडते.मुळात प्रत्येक परिसरातील नागरिकांचे नावे अ पासून ते झेड पर्यंत पाठोपाठ असते ते नावे शोधण्यास वा सापडण्यास सोयीस्कर झाले असते.यावरही विजय ठाकूर यांनी लक्ष वेधले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला मराठा नेते गैरहजर, ४८ पैकी केवळ ८ जणांची उपस्थिती

News Desk

देवभुमीतून आलेल्या राज्यपालांकडून हिंदुत्वाचे प्रमाणपत्र मिळत असेल तर ती काळाची गरज आहे! 

News Desk

मुंबईचा सर्वांगीण विकास ही आमची सर्वोच्च प्राथमिकता! – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

Aprna