HW News Marathi
महाराष्ट्र

मंदिर उघडल्यावर संक्रमण वाढले तर पुन्हा सरकारलाच दोष देणार- संजय राऊत

मुंबई | राज्यात गेले अनेक महिने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन होता. त्यामुळे मंदिरे देखील बंद होती. मात्र, आता ती पुन्हा सुरू करावी अशी मागणी केली जात आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी वक्तव्य केले आहे. “मंदिर उघडल्यावर संक्रमण वाढल्यावर पुन्हा दोष तुम्ही सरकारला देणार असे राऊत म्हणाले. त्यामुळे मंदिर उघडण्याची मागणी करणाऱ्यांनी थोडा संयम बाळगा”,असे आवाहन राऊत यांनी केले आहे. अप्रत्यक्षपणे त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना टोला लगावला आहे.

 दरम्यान, धार्मिक स्थळं उघडायला हवीत परंतु धार्मिक स्थळं उघडल्यानंतर झुंबड उडाली तर काय? असा प्रश्न राज ठाकरेंनी आज (१७ ऑगस्ट) उपस्थित केला होता. या संदर्भात एक नियमावली ठरवावी लागेल, मी सरकारशी बोलतो. कारण मॉल उघडले तर मंदिरं का नाहीत? असा प्रश्न उपस्थित करत दोन दिवस द्या असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले. राज्यातील मंदिरं खुली करण्यात यावी यासाठी त्र्यंबकेश्वर येथील महंत यांनी राज ठाकरे यांची भेट आज कृष्णकुंजवर घेतली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बीडच्या पोलीस अधीक्षकांची होणार चौकशी?, गृहमंत्र्यांचे कारवाईचे संकेत

Aprna

‘म्हणूनच मी मनसे सोडण्याचा निर्णय घेतला, आदित्य शिरोडकरांनी सांगितलं कारण

News Desk

‘आमदार आहात. किमान नागरिकशास्त्र वाचा’, यशवंत जाधवांचा आशिष शेलारांना टोला

News Desk