HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबई- अहमदाबाद मार्गावर भीषण अपघात

मुंबई – अहमदाबाद महामार्गावरील कुडे या ठिकाणी दोन मोठ्या कंटेनरमध्ये अपघात झाला असून वाहनानी पेट घेतला आहे यामध्ये पाठीमागून टक्कर दिलेल्या वाहन चालकाचा जळुन मृत्यु झाला आहे. हि घटना पहाटे ५ वाजताच्या सुमारास घडली आहे. वाहन चालकाला झोप लागल्याने अपघात झालला असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. अग्नीबंब घटना स्थळी हजर झाले आहे. या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली असून वाहतूक एका दिशेने चालु ठेवण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

यंदाचा गणेशोत्सव, दहीहंडी आणि मोहरम निर्बंधमुक्त; गणपती मुर्तीच्या उंचीवरील मर्यादा हटवली!

Aprna

मन की बातमधून मराठमोळ्या वेदांगी कुलकर्णीचे मोदींकडून कौतुक

News Desk

नाणार प्रकल्प कोकणात होणार नाही, म्हणजे नाही | राज ठाकरे

News Desk
देश / विदेश

देशाच्या अर्थव्यवस्थेसंदर्भात सरकार काहीतरी लपवून ठेवत आहे !

Gauri Tilekar

नवी दिल्ली | ‘केंद्र सरकारने आरबीआय अॅक्टमधील ‘सेक्शन ७’ लागू केले आहे. या अंतर्गत सरकारकडून केंद्रीय बँकांना निर्देश पाठवण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर,आज बऱ्याच वाईट बातम्या येऊ शकतात अशी मला भीती वाटत आहे’, अशी चिंता व्यक्त करणारे ट्विट माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केले आहे. भारतात स्वातंत्र्यप्राप्तीनंतर प्रथमच या अॅक्टची अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे म्हटले जात आहे. यामुळे केंद्र सरकार व भारतीय रिझर्व्ह बँकेमधील संबंधांमध्ये मोठा ताण निर्माण झाला आहे. ‘देशाच्या अर्थव्यवस्थेसंदर्भात हे सरकार काही तरी लपवून ठेवत असल्याचे दिसून येत आहे”, असा आरोपही पी. चिदंबरम यांनी केला आहे.

काय आहे सेक्शन ७ ?

भारतीय रिझर्व बँक अॅक्टमधील ‘सेक्शन ७’ कडून सरकारला विशेष अधिकार मिळतात. या सेक्शन अंतर्गत सरकारकडून गर्व्हनरला कोणत्याही स्वरुपातील निर्देश दिले जाऊ शकतात. सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी महत्त्वपूर्ण धोरण लागू करण्याची आवश्यकता वाटल्यास सरकार ‘सेक्शन ७’ लागू करू शकते.

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी भारतीय रिझर्व्ह बँकेवर काल (मंगळवार) टीका केली होती. यूपीए सरकारच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात कर्जे वाटण्याऱ्या बँकांवर मर्यादा आणण्यास रिझर्व्ह बँकेला अपयश आल्याचा आरोपही जेटली यांनी केला होता. यामुळे आरबीआय आणि अर्थमंत्रालयामध्ये निर्माण झालेला तणाव आता चव्हाट्यावर आला आहे.

आरबीआयचे डेप्युटी गर्व्हनर वीरल आचार्य यांनी काहीच दिवसांपूर्वी देशाच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा होण्यासाठी रिझर्व्ह बँकेला स्वातंत्र्य देण्याची गरज व्यक्त केली होती. केंद्रीय बँकांना स्वायत्तता देण्याच्या मुद्यावरून रिझर्व्ह बँक आणि अर्थमंत्रालयामध्ये तणाव निर्माण झाला आहे.

Related posts

#IndependenceDay2020 | पंडित नेहरूंचे लोकप्रिय भाषण “ट्रिस्ट विथ डेस्टिनी”

News Desk

दिल्ली उच्च न्यायालयाला आज अर्ध्या दिवसाची सुट्टी 

News Desk

बाहेर फिरताना हटकल्याने मुजोर तरुणाने थेट पोलीस उपनिरीक्षकाच्या अंगावर चढवली दुचाकी

News Desk