HW News Marathi
महाराष्ट्र

वाहतूक पोलिसांपुढे आता ‘नो वशिलेबाजी’

ठाणे – नियम मोडायचे आणि ‘वर’ फोनाफोनी करून वाहतूक पोलिसांनाच दटावयचे व स्वत:ची सुटका करून घ्यायची, हे वशिलेबाजीचे तंत्र आता वाहकांच्या काहीही उपयोगाला येणार नाही. नियम मोडल्यास त्यांना कारवाईला सामोरे जावेच लागणार आहे. ‘कोणीही फोन केला किंवा सोडवायला आले, तरीही नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर थेट कारवाई करायचीच’ अशी सक्त सूचनाच वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. तसेच कामात हलगर्जी करणाऱ्या कर्मचाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहेत.

‘माझी अमुक साहेबांची ओळख आहे, हे घ्या, साहेबांशी बोला’, असे सांगून वाहनचालक फोन वाहतूक पोलिसांकडे देतो किंवा राजकीय नेत्याला फोन केला जातो. यामुळे वाहतूक पोलिसांच्या कारवाईत अडथळा निर्माण होतो. ओळख नसणाऱ्यांनाच केवळकारवाईला सामोरे जावे लागते. सर्वच ठिकाणी हे प्रकार होत असल्याचे दिसते. परंतु पोलिस उपायुक्त अमित काळे यांनी कोणाचाही फोन घ्यायचा नाही, त्या वाहनचालकांवर कारवाई करायची, अशी सक्त सूचनाच दिली आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांपुढे आता ‘नो वशिलेबाजी’

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेना विधानपरिषद निवडणूक स्वबळावर लढवणार

News Desk

पोलीस उप निरिक्षक परीक्षेत नागनाथ तुकडे आणि अजय लोहेकर उतीर्ण

News Desk

वैतरणा नदीच्या पुरात अडकलेल्या 10 कामगारांना NDRF च्या जवानांनी सुखरुप बाहेर काढले

Aprna