HW News Marathi
महाराष्ट्र

शेतकरी आत्महत्ये प्रकरणी करमाळा बंद, मुख्यमंत्री आल्याशिवाय प्रेत ताब्यात घेणार नाही

अभिराज उबाळे

सोलापूर – कर्जबाजारीपणा नापिकीला कंटाळून करमाळा येथील शेतकरी धनाजी चंद्रकांत जाधव यांनी आत्महत्या केली आहे. आत्महत्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांनी मुख्यमंत्री आल्याशीवाय माझा अंत्यविधी करू नका असा मजकूर लिहीला होता. याप्रकरणी अध्याप शासनाकडून कोणीच आलेले नसल्यानेे करमाळावासीयानी कडकडीत बंद पाळला आहे.

त्यांच्या अंतीम ईच्छा नुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आल्याशिवाय प्रेत ताब्यात घेणार नाही अशी भुमिका करमाळ्यातील शेतकर्यानीं घेतलीय. उपजिल्हा रुग्णालयात शेतकर्यानी एकच गर्दी केलीय . काल रात्री घटना घडुन देखील जिल्ह्याचे पालकमंत्री उपस्थित राहु शकले नाहीत . दरम्यान शेतकरी संघटनेचे खासदार राजु शेट्टी करमाळ्यात येणार असल्याची माहिती पुढे येत आहे . राज्यातील शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर जाधव यांच्या आत्महत्येने राज्यात खळबळ माजलीय . करमाळा तालुक्याने राज्याचे कृषीराज्य मंत्री सदाभाउ खोत यानां तण , मन , धनाने साथ सोबत केली . लोकसभेच्या निवडनुकीत करमाळा तालुक्याने सदाभाऊला लीड दिले होते . त्यामुळे आता सदाभाऊ खोत करमाळ्यात येणार का ? शेतकर्यांशी संवाद साधणार का? अशी चर्चा आता शेतकरी करताहेत . जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख करमाळ्यात दाखल झाले आहेत .

SHARE
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नवाब मलिक यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, चंद्रकांत पाटलांची राज्यपालांकडे मागणी

News Desk

अजित पवार नव्हे तर शरद पवारच पहाटेच्या शपथविधीचे खरे सुत्रधार,फडणवीसांचा गौप्यस्फोट

News Desk

‘नितेश राणे हरवलेत, शोधून देणाऱ्याला मिळेल कोंबडी’; मुंबईत बॅनरबाजी

Aprna